जयपूर: महाराष्ट्रात कथित विमान अपघाताच्या चर्चांनी खळबळ उडवून दिली असतानाच, आता जयपूरमध्ये आणखी एक मोठा विमान अपघात थोडक्यात टळल्याची घटना समोर आली आहे. एअर इंडियाच्या विमानाचं लँडिंग फेल झालं, मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुरक्षित बचावले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील एका नेत्यासंदर्भात विमान अपघाताच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत असतानाच ही जयपूरची घटना घडल्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र संबंधित पहिल्या घटनेबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षित लँडिंग
एअरपोर्ट सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचं AI-1719 हे विमान दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी जयपूर विमानतळावर पोहोचलं. लँडिंगदरम्यान विमान धावपट्टीला स्पर्श करताच तांत्रिक किंवा धावपट्टीवरील स्थितीमुळे लँडिंग फेल झालं.
धोका लक्षात येताच पायलटनं क्षणाचाही विलंब न करता ‘गो-अराउंड’चा निर्णय घेतला. विमानाने सुमारे 10 मिनिटे हवेत घिरट्या घातल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षित लँडिंग करण्यात यश आलं.या विमानातून पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री व राजस्थानचे काँग्रेस प्रभारी सुखजिंदर सिंह रंधवा हेही प्रवास करत होते. सुदैवानं ते पूर्णपणे सुरक्षित आहेत.
‘गो-अराउंड’ म्हणजे काय?
लँडिंगवेळी विमान सुरक्षितपणे उतरवता येणार नाही, अशी शंका पायलटला वाटल्यास तो विमान पुन्हा हवेत उडवतो. यालाच ‘गो-अराउंड’ म्हणतात. हा निर्णय अनेकदा मोठे अपघात टाळतो. जयपूरमध्येही पायलटच्या या सतर्कतेमुळे प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला.
मुंबई: आजचा दिवस अनेक राशींसाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे.…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…
ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…
आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…
एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…
मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…