जयपूर: महाराष्ट्रात कथित विमान अपघाताच्या चर्चांनी खळबळ उडवून दिली असतानाच, आता जयपूरमध्ये आणखी एक मोठा विमान अपघात थोडक्यात टळल्याची घटना समोर आली आहे. एअर इंडियाच्या विमानाचं लँडिंग फेल झालं, मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुरक्षित बचावले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील एका नेत्यासंदर्भात विमान अपघाताच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत असतानाच ही जयपूरची घटना घडल्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र संबंधित पहिल्या घटनेबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षित लँडिंग
एअरपोर्ट सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचं AI-1719 हे विमान दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी जयपूर विमानतळावर पोहोचलं. लँडिंगदरम्यान विमान धावपट्टीला स्पर्श करताच तांत्रिक किंवा धावपट्टीवरील स्थितीमुळे लँडिंग फेल झालं.
धोका लक्षात येताच पायलटनं क्षणाचाही विलंब न करता ‘गो-अराउंड’चा निर्णय घेतला. विमानाने सुमारे 10 मिनिटे हवेत घिरट्या घातल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षित लँडिंग करण्यात यश आलं.या विमानातून पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री व राजस्थानचे काँग्रेस प्रभारी सुखजिंदर सिंह रंधवा हेही प्रवास करत होते. सुदैवानं ते पूर्णपणे सुरक्षित आहेत.
‘गो-अराउंड’ म्हणजे काय?
लँडिंगवेळी विमान सुरक्षितपणे उतरवता येणार नाही, अशी शंका पायलटला वाटल्यास तो विमान पुन्हा हवेत उडवतो. यालाच ‘गो-अराउंड’ म्हणतात. हा निर्णय अनेकदा मोठे अपघात टाळतो. जयपूरमध्येही पायलटच्या या सतर्कतेमुळे प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला.
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…