महाराष्ट्र

रनवेवर थरारक क्षण! एअर इंडियाचं विमान धावपट्टीवर येताच गो-अराउंड, 10 मिनिटे हवेत घिरट्या अन्…

जयपूर: महाराष्ट्रात कथित विमान अपघाताच्या चर्चांनी खळबळ उडवून दिली असतानाच, आता जयपूरमध्ये आणखी एक मोठा विमान अपघात थोडक्यात टळल्याची घटना समोर आली आहे. एअर इंडियाच्या विमानाचं लँडिंग फेल झालं, मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुरक्षित बचावले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील एका नेत्यासंदर्भात विमान अपघाताच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत असतानाच ही जयपूरची घटना घडल्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र संबंधित पहिल्या घटनेबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षित लँडिंग

एअरपोर्ट सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचं AI-1719 हे विमान दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी जयपूर विमानतळावर पोहोचलं. लँडिंगदरम्यान विमान धावपट्टीला स्पर्श करताच तांत्रिक किंवा धावपट्टीवरील स्थितीमुळे लँडिंग फेल झालं.

धोका लक्षात येताच पायलटनं क्षणाचाही विलंब न करता ‘गो-अराउंड’चा निर्णय घेतला. विमानाने सुमारे 10 मिनिटे हवेत घिरट्या घातल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षित लँडिंग करण्यात यश आलं.या विमानातून पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री व राजस्थानचे काँग्रेस प्रभारी सुखजिंदर सिंह रंधवा हेही प्रवास करत होते. सुदैवानं ते पूर्णपणे सुरक्षित आहेत.

‘गो-अराउंड’ म्हणजे काय?

लँडिंगवेळी विमान सुरक्षितपणे उतरवता येणार नाही, अशी शंका पायलटला वाटल्यास तो विमान पुन्हा हवेत उडवतो. यालाच ‘गो-अराउंड’ म्हणतात. हा निर्णय अनेकदा मोठे अपघात टाळतो. जयपूरमध्येही पायलटच्या या सतर्कतेमुळे प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

2 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

2 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

2 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

2 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

2 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

4 तास ago