आरोग्य

आरोग्यासाठी कडुलिंबाचा रस

कडुलिंबाचे झाड आरोग्याचा खजिना आहे. याची पाने, फुले, रस, अगदी दात घासण्या पर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी वापर होतो. अनेक आजारांवर कडुलिंबाचा उपयोग केला जातो. आठवड्यातून एकदा कडुलिंबाचा रस पोटातील सर्व घाण, जंतू आणि विकार सहज बाहेर करण्याचा नैसर्गिक उपाय आहे.

कडुलिंबाचा रस: कडुलिंबाचे ताजे, स्वच्छ पाने धुवून मिक्सर मध्ये थोडे पाणी टाकून रस तयार करावा. हा रस गाळून घ्यावा म्हणजे प्यायला सोपा होईल. इच्छेनुसार त्यात थोडा मध किंवा लिंबाचा रस टाकल्यास त्याची कडवट चव कमी होते. आठवड्यातून एकदाच कडुलिंबाचा रस घ्यावा. सकाळी रिकाम्या पोटी ३० ते ५० मिली (सुमारे अर्धा ग्लास) रस घेणे उत्तम. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि पचनक्रिया सुधारते. पण हा रस दररोज घेऊ नये, कारण जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरात उष्णता वाढू शकते.

होणारे फायदे: पोटातील जुनी घाण, जंतू आणि कृमी नैसर्गिकरीत्या बाहेर टाकले जातात. पचन सुधारते, भूक वाढवते आणि अपचन कमी होते. रक्तशुध्दीकरण करून त्वचेचे आजार, पिंपल्स, पुरळ कमी होतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यामुळे लहानसहान आजारांपासून बचाव होतो. उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो आणि उष्मा कमी होतो.

घ्यावयाची काळजी: गर्भवती महिला, लहान मुले किंवा ज्यांना जास्त उष्णतेची तक्रार आहे, त्यांनी हा रस डॉक्टरांचा सल्ला न घेता पिऊ नये. योग्य प्रमाणात आणि योग्य पध्दतीने घेतल्यासच तो फायदेशीर ठरतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

28 मिनिटे ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

33 मिनिटे ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

48 मिनिटे ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

54 मिनिटे ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

56 मिनिटे ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

2 तास ago