कडुलिंबाचे झाड आरोग्याचा खजिना आहे. याची पाने, फुले, रस, अगदी दात घासण्या पर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी वापर होतो. अनेक आजारांवर कडुलिंबाचा उपयोग केला जातो. आठवड्यातून एकदा कडुलिंबाचा रस पोटातील सर्व घाण, जंतू आणि विकार सहज बाहेर करण्याचा नैसर्गिक उपाय आहे.
कडुलिंबाचा रस: कडुलिंबाचे ताजे, स्वच्छ पाने धुवून मिक्सर मध्ये थोडे पाणी टाकून रस तयार करावा. हा रस गाळून घ्यावा म्हणजे प्यायला सोपा होईल. इच्छेनुसार त्यात थोडा मध किंवा लिंबाचा रस टाकल्यास त्याची कडवट चव कमी होते. आठवड्यातून एकदाच कडुलिंबाचा रस घ्यावा. सकाळी रिकाम्या पोटी ३० ते ५० मिली (सुमारे अर्धा ग्लास) रस घेणे उत्तम. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि पचनक्रिया सुधारते. पण हा रस दररोज घेऊ नये, कारण जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरात उष्णता वाढू शकते.
होणारे फायदे: पोटातील जुनी घाण, जंतू आणि कृमी नैसर्गिकरीत्या बाहेर टाकले जातात. पचन सुधारते, भूक वाढवते आणि अपचन कमी होते. रक्तशुध्दीकरण करून त्वचेचे आजार, पिंपल्स, पुरळ कमी होतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यामुळे लहानसहान आजारांपासून बचाव होतो. उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो आणि उष्मा कमी होतो.
घ्यावयाची काळजी: गर्भवती महिला, लहान मुले किंवा ज्यांना जास्त उष्णतेची तक्रार आहे, त्यांनी हा रस डॉक्टरांचा सल्ला न घेता पिऊ नये. योग्य प्रमाणात आणि योग्य पध्दतीने घेतल्यासच तो फायदेशीर ठरतो.
(सोशल मीडियावरून साभार)
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…