मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, या अभियानातून तब्बल ७ हजार पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी प्रदेश काँग्रेसतर्फे विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २६ ते २९ मेदरम्यान मुंबईतील टिळक भवन येथे विभागनिहाय पार पडणार आहे.
प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या शिबिरात विविध विषयांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. संघटन बांधणी, पक्षाची विचारधारा, जनसंपर्क, सोशल मीडिया व निवडणूक व्यवस्थापन आदी विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षक नियुक्त केले होते. त्यांच्यासोबत प्रदेश काँग्रेसनेही दोन निरीक्षकांची नियुक्ती केली होती. या निरीक्षकांनी जिल्हा व तालुका स्तरावर जाऊन इच्छुकांकडून अर्ज मागवले, मुलाखती घेतल्या आणि त्यानंतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.या प्रक्रियेत आघाडी, संघटना, विभाग आणि सेल स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) Adv. Ganesh Patil यांनी दिली.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAसोबत जाणार…
उन्हाळ्यात शरीराला आतून थंडगार ठेवण्यासाठी आपण आहारात दही - ताकाचा समावेश करतो. या दिवसांत दही…
२४ तासात मनुष्य किती वेळा श्वास घेतो? मानवी शरीर प्रत्यक्षात एखाद्या रहस्याहून कमी नाही. किंबहुना…
किडनी स्टोनचा त्रास खूप भयंकर आणि असह्य असतो. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी सोबतच कमी पाणी पिण्याची…
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे…
पुणे : आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न…