मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, या अभियानातून तब्बल ७ हजार पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी प्रदेश काँग्रेसतर्फे विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २६ ते २९ मेदरम्यान मुंबईतील टिळक भवन येथे विभागनिहाय पार पडणार आहे.
प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या शिबिरात विविध विषयांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. संघटन बांधणी, पक्षाची विचारधारा, जनसंपर्क, सोशल मीडिया व निवडणूक व्यवस्थापन आदी विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षक नियुक्त केले होते. त्यांच्यासोबत प्रदेश काँग्रेसनेही दोन निरीक्षकांची नियुक्ती केली होती. या निरीक्षकांनी जिल्हा व तालुका स्तरावर जाऊन इच्छुकांकडून अर्ज मागवले, मुलाखती घेतल्या आणि त्यानंतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.या प्रक्रियेत आघाडी, संघटना, विभाग आणि सेल स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) Adv. Ganesh Patil यांनी दिली.
१.४७ कोटींचा मुद्देमाल जप्त; २० हजार लिटर संशयित दूध जागीच नष्ट, २६ आरोपींवर गुन्हा; १३…
अमरावती: अमरावती शहरात शनिवारी (४ जुलै) रात्री उशिरा लुडो खेळादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC परिसरातील औद्योगिक शांतता, कायदा व सुव्यवस्था, कामगार सुरक्षा तसेच…
पुणे: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) आणि जुना पुणे–मुंबई महामार्ग या…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेतील कथित पाईप चोरी प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या प्रकरणात…
पावसाळ्यात कपडे, शूज आणि वाहन तपासूनच वापरा; विंचू-सापांपासून सावध राहण्याचे आवाहन चंद्रपूर: पावसाळ्यात घरात विंचू,…