मुंबई: मुंबईतील दहिसर पश्चिम येथील दिवंगत गोपीनाथ मुंडे मैदानावर महिला अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांची भरती सुरु होती. जिथे रात्रीपासून महिला जमा झाल्या होत्या आणि त्याच ठिकाणी भरतीची तयारी करत होत्या. मात्र सकाळी मुलींना गेटमधून आत जाऊ दिले नाही. त्यानंतर मुलींनी बीएमसी हाय हायच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.
घोषणाबाजी दरम्यान पोलिस आणि तरुणींमध्ये बाचाबाची झाली. संपूर्ण महाराष्ट्रातून या मुली जमल्या होत्या. या भरतीबाबत मुलीनी भेदभाव होत असल्याचा व ही भरती नव्याने होण्याची मागणी करत आंदोलन केले. मैदानात प्रवेश न मिळाल्याने मुली मैदानाचे दुभाजक ओलांडून आत प्रवेश करत होत्या.
त्यावेळी गदारोळ झाला,पोलीसांनी लाठीचार्ज केला,यात काहीजणी जखमी झाल्याचे मुलीनी सागितले. ही अत्यंत धक्कादायक व गंभीर बाब असून मुलीवर झालेल्या लाठीचार्ज ची चौकशी व्हायला हवी आणि नियोजनबद्ध रित्या पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया व्हावी, अशी मागणी मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, विधान परिषद उपसभापती मा डॉ नीलम गोऱ्हे व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार शीतल करदेकर यांनी ट्विटर व्दारे केली आहे.
बेरोजगारीने त्रस्त तरूणाईला काम हवय आणि नोकरी देताना भरती प्रक्रियेत धांदली व महिलावर लाठीचार्ज होत असेल तर ते अत्यंत धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.
राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…
मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…
मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…
चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…