मुंबई: मुंबईतील दहिसर पश्चिम येथील दिवंगत गोपीनाथ मुंडे मैदानावर महिला अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांची भरती सुरु होती. जिथे रात्रीपासून महिला जमा झाल्या होत्या आणि त्याच ठिकाणी भरतीची तयारी करत होत्या. मात्र सकाळी मुलींना गेटमधून आत जाऊ दिले नाही. त्यानंतर मुलींनी बीएमसी हाय हायच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.
घोषणाबाजी दरम्यान पोलिस आणि तरुणींमध्ये बाचाबाची झाली. संपूर्ण महाराष्ट्रातून या मुली जमल्या होत्या. या भरतीबाबत मुलीनी भेदभाव होत असल्याचा व ही भरती नव्याने होण्याची मागणी करत आंदोलन केले. मैदानात प्रवेश न मिळाल्याने मुली मैदानाचे दुभाजक ओलांडून आत प्रवेश करत होत्या.
त्यावेळी गदारोळ झाला,पोलीसांनी लाठीचार्ज केला,यात काहीजणी जखमी झाल्याचे मुलीनी सागितले. ही अत्यंत धक्कादायक व गंभीर बाब असून मुलीवर झालेल्या लाठीचार्ज ची चौकशी व्हायला हवी आणि नियोजनबद्ध रित्या पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया व्हावी, अशी मागणी मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, विधान परिषद उपसभापती मा डॉ नीलम गोऱ्हे व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार शीतल करदेकर यांनी ट्विटर व्दारे केली आहे.
बेरोजगारीने त्रस्त तरूणाईला काम हवय आणि नोकरी देताना भरती प्रक्रियेत धांदली व महिलावर लाठीचार्ज होत असेल तर ते अत्यंत धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…