मुंबई: प्रसिद्ध कवी आणि लेखक विंदा करंदीकर यांच्या निवडक कविता व साहित्याचा अभिवाचन विशेष कार्यक्रम ‘वाचू आनंदे’ लवकरच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती, लेखिका डॉ. नीलम गोऱ्हे आणि कवी, गीतकार प्रवीण दवणे यांच्या सादरीकरणातून हा साहित्यिक ठेवा रसिकांसमोर सादर होणार आहे.
हा विशेष कार्यक्रम २४ आणि २५ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता प्रसारित होणार असून, पुनःप्रसारण २६ आणि २७ मार्च दुपारी ३.३० वाजता होईल. उत्तरा मोने यांनी या कार्यक्रमासाठी संशोधन व संयोजनाची जबाबदारी सांभाळली आहे.
डॉ. नीलम गोऱ्हे यांचा साहित्यप्रेमी दृष्टिकोन आणि अभिवाचन शैली प्रेक्षकांना निश्चितच एका आगळ्यावेगळ्या अनुभवाचा आनंद देईल. विंदा करंदीकर यांच्या गूढ, तत्त्वचिंतनपर आणि हृदयस्पर्शी कवितांचा हा प्रवास रसिकांना त्यांच्या साहित्यसंपदेकडे नव्याने नेईल.
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…