मुंबई: प्रसिद्ध कवी आणि लेखक विंदा करंदीकर यांच्या निवडक कविता व साहित्याचा अभिवाचन विशेष कार्यक्रम ‘वाचू आनंदे’ लवकरच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती, लेखिका डॉ. नीलम गोऱ्हे आणि कवी, गीतकार प्रवीण दवणे यांच्या सादरीकरणातून हा साहित्यिक ठेवा रसिकांसमोर सादर होणार आहे.
हा विशेष कार्यक्रम २४ आणि २५ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता प्रसारित होणार असून, पुनःप्रसारण २६ आणि २७ मार्च दुपारी ३.३० वाजता होईल. उत्तरा मोने यांनी या कार्यक्रमासाठी संशोधन व संयोजनाची जबाबदारी सांभाळली आहे.
डॉ. नीलम गोऱ्हे यांचा साहित्यप्रेमी दृष्टिकोन आणि अभिवाचन शैली प्रेक्षकांना निश्चितच एका आगळ्यावेगळ्या अनुभवाचा आनंद देईल. विंदा करंदीकर यांच्या गूढ, तत्त्वचिंतनपर आणि हृदयस्पर्शी कवितांचा हा प्रवास रसिकांना त्यांच्या साहित्यसंपदेकडे नव्याने नेईल.
राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…
मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…
मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…
चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…