महाराष्ट्र

वर्षा उसगावकर म्हणाल्या मरेपर्यंत लक्ष्याची ती इच्छा पूर्ण झालीच नाही…

वर्षा उसगावकरांनी सांगितली कुणालाही माहीत नसलेली गोष्ट

मुंबई: वयाच्या पन्नाशीतही एव्हरग्रीन दिसणाऱ्या मराठी अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर. त्यांच्या अभिनयामुळे त्यांना मराठीतल्या वंडर गर्ल असा टॅग दिला गेला. त्यांनी एकेकाळी मराठी इंडस्ट्रीवर राज्य केलं.

आताही वर्षा मराठी मालिकांमध्ये सक्रीय आहेत. त्या अनेक वर्षांपूर्वी ‘दुनियादारी’ चित्रपटात दिसल्या होत्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी प्रत्येक टॉपच्या मराठी आणि हिंदी अभिनेत्यांसोबत काम केलंय. त्यांनी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतही अनेक चित्रपटात काम केलं. एका मुलाखतीत वर्षा यांनी लक्ष्मीकांत यांच्या मनातली ती इच्छा सांगितली जी कधीही पूर्ण झाली नाही.

वर्षा बोलताना म्हणाल्या, ‘मला वाटतं आज लक्षा असता तर तो एका वेगळ्या पद्धतीने चमकला असता. त्याचं अकाली निधन झालं असं म्हणेन मी. लक्षाबरोबर मी ‘एक होता विदूषक’ हा चित्रपट केलेला. त्याच्या आधी कसं आहे, लक्षा म्हणजे कॉमेडी कॉमेडी आणि कॉमेडी. लक्ष्याला ती खंत होतीच की माझा एक वेगळा पैलूपण प्रेक्षकांना दिसला पाहिजे. जब्बार पटेलांनी हा चित्रपट त्याला दिला. तेव्हा लक्ष्याचा मला फोन आला आणि तो म्हणाला की या चित्रपटात मला तू हवी आहेस. तू हा चित्रपट कर. भले तुला मानधन कमी देतील. स्त्री प्रधान हा चित्रपट नसेल पण तू हा चित्रपट करावास अशी माझी इच्छा आहे. मीदेखील तो चित्रपट केला.

वर्षा पुढे म्हणाल्या, ‘लक्ष्याने ज्या पद्धतीने त्यात काम केलंय ते मला खूप टचिंग वाटलं. तो त्याचे सीन नसला तरी तिथे हजर असायचा. एक वेगळा लक्ष्या मला तिथे दिसला. त्या चित्रपटासाठी त्याला पुरस्कार मिळायला हवा होता. मला असं वाटलं की त्याने अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स केला होता. पण त्या वर्षीचा अवॉर्ड त्याला मिळालं नाही. त्याला खूप वाईट वाटलं. त्याला कायम ती खंत वाटत राहिली की या चित्रपटासाठी मला अवॉर्ड मिळायला पाहिजे होता. आणि खरंच मलाही असं वाटतं की त्याला ते अवॉर्ड मिळायला पाहिजे होतं. ते जर त्याला मिळालं असतं तर त्याच्या अभिनयाला एक वेगळा पैलू पडला असता. त्याच्या त्या विनोदी अभिनेत्याच्या चौकटीतून तो बाहेर आला असता. वर्षा यांनी यापूर्वी ”बिग बॉस मराठी ३” मध्ये सहभाग घेतला होता. सोबतच त्या ‘सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत दिसल्या होत्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

11 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

11 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

11 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

13 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago