महाराष्ट्र

वर्षा उसगावकर म्हणाल्या मरेपर्यंत लक्ष्याची ती इच्छा पूर्ण झालीच नाही…

वर्षा उसगावकरांनी सांगितली कुणालाही माहीत नसलेली गोष्ट

मुंबई: वयाच्या पन्नाशीतही एव्हरग्रीन दिसणाऱ्या मराठी अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर. त्यांच्या अभिनयामुळे त्यांना मराठीतल्या वंडर गर्ल असा टॅग दिला गेला. त्यांनी एकेकाळी मराठी इंडस्ट्रीवर राज्य केलं.

आताही वर्षा मराठी मालिकांमध्ये सक्रीय आहेत. त्या अनेक वर्षांपूर्वी ‘दुनियादारी’ चित्रपटात दिसल्या होत्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी प्रत्येक टॉपच्या मराठी आणि हिंदी अभिनेत्यांसोबत काम केलंय. त्यांनी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतही अनेक चित्रपटात काम केलं. एका मुलाखतीत वर्षा यांनी लक्ष्मीकांत यांच्या मनातली ती इच्छा सांगितली जी कधीही पूर्ण झाली नाही.

वर्षा बोलताना म्हणाल्या, ‘मला वाटतं आज लक्षा असता तर तो एका वेगळ्या पद्धतीने चमकला असता. त्याचं अकाली निधन झालं असं म्हणेन मी. लक्षाबरोबर मी ‘एक होता विदूषक’ हा चित्रपट केलेला. त्याच्या आधी कसं आहे, लक्षा म्हणजे कॉमेडी कॉमेडी आणि कॉमेडी. लक्ष्याला ती खंत होतीच की माझा एक वेगळा पैलूपण प्रेक्षकांना दिसला पाहिजे. जब्बार पटेलांनी हा चित्रपट त्याला दिला. तेव्हा लक्ष्याचा मला फोन आला आणि तो म्हणाला की या चित्रपटात मला तू हवी आहेस. तू हा चित्रपट कर. भले तुला मानधन कमी देतील. स्त्री प्रधान हा चित्रपट नसेल पण तू हा चित्रपट करावास अशी माझी इच्छा आहे. मीदेखील तो चित्रपट केला.

वर्षा पुढे म्हणाल्या, ‘लक्ष्याने ज्या पद्धतीने त्यात काम केलंय ते मला खूप टचिंग वाटलं. तो त्याचे सीन नसला तरी तिथे हजर असायचा. एक वेगळा लक्ष्या मला तिथे दिसला. त्या चित्रपटासाठी त्याला पुरस्कार मिळायला हवा होता. मला असं वाटलं की त्याने अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स केला होता. पण त्या वर्षीचा अवॉर्ड त्याला मिळालं नाही. त्याला खूप वाईट वाटलं. त्याला कायम ती खंत वाटत राहिली की या चित्रपटासाठी मला अवॉर्ड मिळायला पाहिजे होता. आणि खरंच मलाही असं वाटतं की त्याला ते अवॉर्ड मिळायला पाहिजे होतं. ते जर त्याला मिळालं असतं तर त्याच्या अभिनयाला एक वेगळा पैलू पडला असता. त्याच्या त्या विनोदी अभिनेत्याच्या चौकटीतून तो बाहेर आला असता. वर्षा यांनी यापूर्वी ”बिग बॉस मराठी ३” मध्ये सहभाग घेतला होता. सोबतच त्या ‘सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत दिसल्या होत्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

11 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

19 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

20 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

21 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago