मुंबई: (धम्मचक्र प्रवर्तन दिन) आता फक्त ऐतिहासिक स्मरणापुरता न राहता, तो सामाजिक बांधिलकीचा दिवस ठरवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, कपडे आणि मिठाई वाटून हा दिवस साजरा करण्याचे आवाहन ‘एक वही एक पेन अभियान’च्या वतीने करण्यात आले आहे.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात लाखो अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेला स्मरण करून देत,एक वही एक पेन अभियानाचे प्रणेते,
पत्रकार राजू झनके यांनी सांगितले,की, “सम्राट अशोकाने धम्मचक्र गतिमान केले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावर कळस चढविला. त्यांनी समाजाला शिक्षणाचा मूलमंत्र दिला. आजही वंचित, उपेक्षित समाजातील अनेक कुटुंबांना दोन वेळचे अन्न मिळणे कठीण जाते, अशा स्थितीत मुलांच्या शिक्षणासाठी साहित्य पुरवणे ही खरी बाबासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली ठरेल.”
या पार्श्वभूमीवर येत्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी समाजातील बांधवांना शैक्षणिक साहित्य, मिठाई आणि कपडे वाटून धम्मचक्र प्रवर्तन दिन दिवाळीप्रमाणे साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एक वही एक पेन अभियानच्या वतीने उद्या मुंबई तील मानखुर्द पूर्व, पंचशील बुध्द विहार येथील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.“दहा धम्मबांधवांपैकी किमान एका बांधवाने जरी एखाद्या विद्यार्थ्याला एका वर्षासाठी शैक्षणिक साहित्य पुरवून दत्तक घेतले, तरी बाबासाहेबांच्या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल,” असे झनके म्हणाले.
धम्म चक्र प्रवर्तन दिनी दादर चैत्यभूमी,नागपूरची दीक्षाभूमी ,महू येथील जन्मभूमी तसेच देशात ठिकठिकाणी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसेच बुध्दविहारांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात .यावेळी डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना, हारफुलांऐवजी वह्या पेन, स्पर्धा परीक्षांची पुस्तके आदी शैक्षणिक साहित्यांची आदरांजली अर्पण करावी असे आवाहन एक वही एक पेन अभियानचे प्रणेते, पत्रकार राजू झनके यांनी केले आहे.जमा झालेले हे साहित्य समाजातील वंचित आर्थिक दुर्बल तसेच पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना वितरित करावे. शिक्षणाच्या या वाटचालीसाठी सर्व धम्मबांधवांनी एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन अभियानच्या वतीने करण्यात आले आहे.
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…