महाराष्ट्र

बिहार प्रांत कधी सुधारणार

मुंबईकरांच्या हक्कांवर गदा नको

मुंबई: मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा कणा आहे. मात्र आज प्रश्न असा आहे की मुंबईकरांना त्यांच्या हक्काच्या सुविधा त्यांच्या स्वतःच्या शहरात कधी मिळणार?

मुंबई पोर्ट ट्रस्टची जमीन; हक्क कुणाचा?

बीपीटी अर्थात मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडे दक्षिण मुंबईतील डॉकयार्ड, वडाळा, शिवडी, माटुंगा, वरळी अशा मोलाच्या जमिनींचे नियंत्रण आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्या तरी या जमिनींवर नैतिक व सामाजिक हक्क हा मुंबईकरांचाच आहे.

पण दुर्दैवाने, हा आवाज विचारतो कोण

केंद्रशरण गेलेली आपलीच मराठी माणसं ‘मुंबई आपली’ हा विचार दुय्यम ठरवतात. इतर राज्यांमध्ये भाषिक व सांस्कृतिक अस्मिता ठळकपणे जपली जाते; मग मुंबईत ती ज्वलंत का नाही? ‘सर्वसमावेशकता’ हा आपला स्वभाव आहे, पण आता त्यालाही मर्यादा हव्यात.

कोळीवाडे, गावठाणे आणि नियोजनाचा गोंधळ

मुंबईतील कोळीवाडे व गावठाणे ही मूळ कोळी समाजाची मालमत्ता होती आणि आहे. मात्र या जमिनी कशा, कोणत्या प्रक्रियेत आणि कुणाच्या फायद्यासाठी गमावल्या गेल्या, याचा सखोल अभ्यास नगरविकास खात्याने करणे अत्यावश्यक आहे. मुंबईचा विकास आराखडा आखताना जमिनींच्या कक्षा कशा ठरवल्या गेल्या? भ्रष्ट नेते, अधिकारी आणि बिल्डर लॉबी यांची साखळी यात जबाबदार नाही का?

आरोग्य सेवांवरील प्रचंड ताण

मुंबईवर आधीच लोकसंख्येचा, पायाभूत सुविधांचा आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा प्रचंड ताण आहे. देशभरातून, विशेषतः इतर राज्यांतून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी मुंबईत येतात. याचा थेट भार राज्य सरकार व महापालिकेच्या रुग्णालयांवर पडतो.  मात्र मूळ मुंबईकरांसाठी स्वतंत्र नियोजन, प्राधान्य व्यवस्था का नाही?

३० मजली ‘बिहार भवन’ आणि मूलभूत प्रश्न

मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एलिफंट इस्टेट येथे सुमारे ३० मजली ‘बिहार भवन’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

३१४.२० कोटी रुपयांची मंजुरी

०.६७ एकर जागा, ६९ मीटर उंची

१७८ खोल्या, २४० खाटांची डॉर्मिटरी

स्वतंत्र वैद्यकीय सुविधा, पार्किंग, कॉन्फरन्स हॉल

हे सर्व बिहारमधून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या सोयीसाठी.

मग प्रश्न साधा आहे…

हीच सोय बिहारमध्ये का करता येत नाही?

तिथे दर्जेदार रुग्णालये, उपचार व्यवस्था का उभी राहत नाही?

मुंबईवरच सगळा भार का?

मोठे पैसेवाले कुठेही उपचार घेऊ शकतात. पण सर्वसामान्य मुंबईकरांनी मात्र कर भरूनही उपचारांसाठी तडफडायचं?

राजकीय प्रतिक्रिया आणि वास्तव

मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार म्हणतात “हे काही होऊ देणार नाही.”भाजपाचे प्रवक्ते मात्र याला प्रांतवाद ठरवतात.

पण वास्तव असे आहे की

महाराष्ट्राने विकास केला, सर्वांना सामावून घेतले.

महाराष्ट्रातील लोक इतर राज्यांत जाऊन दादागिरी करत नाहीत.

मुंबईकरांच्या हक्कांचा मुद्दा ऐरणीवर

मुंबईतील जमीन, आरोग्य सेवा आणि मूलभूत सुविधा यावर प्रथम अधिकार मुंबईकरांचा व महाराष्ट्रातील जनतेचा असायलाच हवा. यासाठी आरोग्य विभागाने वेगळी ‘परमिट योजना’ सुरू करण्याची वेळ आली आहे.हे वैर नाही, तर जबाबदारीची जाणीव आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

2 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

2 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

2 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

2 तास ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

13 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

17 तास ago