नाशिक: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी नाशिकच्या हनीट्रॅप प्रकरणावर सभागृहाला माहिती दिली. शिवाय कुठल्याही आजी-माजी मंत्र्याची तशी तक्रार नसल्याचं ते म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार नाना पटोले यांनी गुरुवारी सभागृहात पेन डाईव्ह बॉम्ब फोडला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील नाशिकच्या हॉटेल चालकाचे कारनामे उघड केले होते. अनेक मोठे अधिकारी आणि बुहतांश नेत्यांनी नाशिकच्या त्या हॉटेलचा पाहुणचार घेतल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला होता.
जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, नाशिकचा तो हॉटेलचालक बहुतांश राजकीय नेत्यांच्या जवळचा आहे. तो त्या नेत्यांची सगळी सोय करतो. त्याने एक रुम केली असून हॉटेलमध्ये ८ कोटी रुपयांचे कॅमेरे बसवलेले आहेत. या कॅमेऱ्याचा वापर तो पुढाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अडकवण्यासाठी करतो.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन करताना म्हटलं की, सध्यातरी सरकारकडे कुठल्याही आजी-माजी मंत्र्यांच्या हनीट्रॅपची तक्रार नाही. नाना पटोलेंनी जो पेन ड्राईव्ह दाखवला तो त्यांनी आमच्याकडे द्यावा. त्याची चौकशी करु.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, नाशिकसंदर्भात एक तक्रार आलेली होती. एका महिलेने तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांनी ही तक्रार परत घेतली. एका उपजिल्हाधिकाऱ्यासंदर्भात ही तक्रार होती. आपण सातत्याने हॉटेल आणि हॉटेल मालकाचा उल्लेख करतायत. ती व्यक्ती काँग्रेसची आहे. त्या व्यक्तीने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. अशा प्रकारे सभागृहाचा वेळ घालवणे, सभागृह बंद पाडणं चूक आहे. थेट पुरावे आणायचे आणि सत्ताधारी पक्षाची बोलती बंद करायची, असा सल्लाच फडणवीसांनी विरोधकांना दिला.
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…