नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.
वडेट्टीवार म्हणाले, ज्याला महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही, अशा व्यक्तीने महाराजांवर भाष्य करण्याची हिंमत कशी केली? छत्रपती शिवाजी महाराज कोणापुढे झुकले असते, तर स्वराज्य उभे राहिले नसते. सत्ताधारी नेते अशा लोकांच्या पायाशी जात असल्यामुळेच त्यांची मस्ती वाढली असून ते वारंवार अपमानास्पद वक्तव्य करत आहेत. संबंधित प्रकरणात मुख्यमंत्री तात्काळ का बोलले नाहीत, असा सवालही त्यांनी केला. तसेच, शिवप्रेमी असल्याचा दावा करणारे काही नेते आता शांत का आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. विरोधात असताना एसटी विलीनीकरणासाठी आक्रमक भूमिका घेणारे भाजप नेते सत्तेत आल्यानंतर गप्प का आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तेलंगणा सरकारने एसटीचे विलीनीकरण करून कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या, तर महाराष्ट्रात ते का शक्य होत नाही, असा सवाल त्यांनी केला. एसटी ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असून कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
चंद्रपूरच्या राजकारणावर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले की, काही चुका झाल्याने सत्ता गेली असली तरी आता परिस्थिती बदलत आहे. महापालिकेतील अनेक नगरसेवक संपर्कात असून लवकरच सत्ता परिवर्तन होईल, असा दावा त्यांनी केला. भाजपचा बालेकिल्ला ढासळण्यास वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कथित भेटीबाबत विचारले असता, यावर संबंधित नेतेच बोलू शकतात, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य टाळले. मात्र, काही सामाजिक कार्यक्रमांच्या निमित्ताने राजकीय जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…
मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…
शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…