महाराष्ट्र

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.

वडेट्टीवार म्हणाले, ज्याला महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही, अशा व्यक्तीने महाराजांवर भाष्य करण्याची हिंमत कशी केली? छत्रपती शिवाजी महाराज कोणापुढे झुकले असते, तर स्वराज्य उभे राहिले नसते. सत्ताधारी नेते अशा लोकांच्या पायाशी जात असल्यामुळेच त्यांची मस्ती वाढली असून ते वारंवार अपमानास्पद वक्तव्य करत आहेत. संबंधित प्रकरणात मुख्यमंत्री तात्काळ का बोलले नाहीत, असा सवालही त्यांनी केला. तसेच, शिवप्रेमी असल्याचा दावा करणारे काही नेते आता शांत का आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. विरोधात असताना एसटी विलीनीकरणासाठी आक्रमक भूमिका घेणारे भाजप नेते सत्तेत आल्यानंतर गप्प का आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तेलंगणा सरकारने एसटीचे विलीनीकरण करून कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या, तर महाराष्ट्रात ते का शक्य होत नाही, असा सवाल त्यांनी केला. एसटी ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असून कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

चंद्रपूरच्या राजकारणावर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले की, काही चुका झाल्याने सत्ता गेली असली तरी आता परिस्थिती बदलत आहे. महापालिकेतील अनेक नगरसेवक संपर्कात असून लवकरच सत्ता परिवर्तन होईल, असा दावा त्यांनी केला. भाजपचा बालेकिल्ला ढासळण्यास वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कथित भेटीबाबत विचारले असता, यावर संबंधित नेतेच बोलू शकतात, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य टाळले. मात्र, काही सामाजिक कार्यक्रमांच्या निमित्ताने राजकीय जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

2 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

2 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

2 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

5 तास ago

जन्मभूमीतून कर्मभूमीकडे! गोदा ते नर्मदा जलयात्रा; नारीशक्ती आणि विकासाचा नवा महामंत्र

अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…

5 तास ago

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानावरून काँग्रेस आक्रमक

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश…

5 तास ago