शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील म्हसे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीत निलेश पोपट नरसाळे यांची एकमताने सरपंचपदी निवड करण्यात आली आहे. विद्यमान सरपंच मंगलताई जयवंत मुसळे यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.
ही निवड प्रक्रिया मंडल अधिकारी राजेंद्र पोटकुले,ग्राम महसुल आधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, तसेच ग्रामसेविका पल्लवी गावडे (रंधवान) यांच्या उपस्थितीत पार पडली. ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सौरभ दादा काळूराम पवार, जालिंदर संताजी मुसळे,प्रियंका जालिंदर खाडे, मंदाताई वेताळ आणि दामिनी हनुमंत मुसळे यांनी एकमुखाने निलेश नरसाळे यांच्या निवडीला पाठिंबा दिला.
या निवडीनंतर गावात आनंदाचे वातावरण पसरले असून टाकळीहाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे,सुभाष पोकळे,अरुणाताई घोडे, मनीषाताई गावडे,शुभांगी पडवळ,भास्कर शेठ उचळे, शंकर पिंगळे ,मोहन चोरे,शिवाजी नरसाळे,बन्सी घोडे,पारभाऊ गावडे, सुरेश चोरे, गोविंद गावडे,सुरेश साबळे, काळूराम शेठ पवार आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी नवनिर्वाचित सरपंचांचे अभिनंदन केले.या कार्यक्रमाचे निवेदन लहू साबळे यांनी केले तर अर्जुन पवार यांनी निवड प्रक्रिया यशस्वी पार पाडल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.नवनिर्वाचित सरपंच निलेश पोपट नरसाळे यांनी ग्रामविकासासाठी सर्व सदस्यांसह एकजुटीने काम करण्याचा संकल्प या वेळी व्यक्त केला.
पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…
घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…
व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…
लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…
मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…