राजकीय

म्हसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निलेश पोपट नरसाळे यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील म्हसे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीत निलेश पोपट नरसाळे यांची एकमताने सरपंचपदी निवड करण्यात आली आहे. विद्यमान सरपंच मंगलताई जयवंत मुसळे यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.

ही निवड प्रक्रिया मंडल अधिकारी राजेंद्र पोटकुले,ग्राम महसुल आधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, तसेच ग्रामसेविका पल्लवी गावडे (रंधवान) यांच्या उपस्थितीत पार पडली. ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सौरभ दादा काळूराम पवार, जालिंदर संताजी मुसळे,प्रियंका जालिंदर खाडे, मंदाताई वेताळ आणि दामिनी हनुमंत मुसळे यांनी एकमुखाने निलेश नरसाळे यांच्या निवडीला पाठिंबा दिला.

या निवडीनंतर गावात आनंदाचे वातावरण पसरले असून टाकळीहाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे,सुभाष पोकळे,अरुणाताई घोडे, मनीषाताई गावडे,शुभांगी पडवळ,भास्कर शेठ उचळे, शंकर पिंगळे ,मोहन चोरे,शिवाजी नरसाळे,बन्सी घोडे,पारभाऊ गावडे, सुरेश चोरे, गोविंद गावडे,सुरेश साबळे, काळूराम शेठ पवार आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी नवनिर्वाचित सरपंचांचे अभिनंदन केले.या कार्यक्रमाचे निवेदन लहू साबळे यांनी केले तर अर्जुन पवार यांनी निवड प्रक्रिया यशस्वी पार पाडल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.नवनिर्वाचित सरपंच निलेश पोपट नरसाळे यांनी ग्रामविकासासाठी सर्व सदस्यांसह एकजुटीने काम करण्याचा संकल्प या वेळी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

7 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

11 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

11 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

11 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

11 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

12 तास ago