राजकीय

मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर; हॉटेल पॉलिटिक्सच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण

मुंबई: महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून निकाल जाहीर झाले आहेत. मुंबई महानगरपालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपाला ८९ तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २९ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, निवडणूक निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचे सर्व २९ नवनिर्वाचित नगरसेवक मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये ठेवले असल्याने राजकीय वर्तुळात ‘हॉटेल पॉलिटिक्स’ची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चांवर आता एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

जनमताचा अनादर करणार नाही; एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले, “२०१९ साली जनमताचा अनादर करून तत्कालीन ठाकरे गटाने वेगळी सत्ता स्थापन केली होती. मात्र आम्ही तसं करणार नाही. आम्ही जनतेच्या निर्णयाचा पूर्ण आदर करतो. बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीने ही निवडणूक लढवली आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी महायुती एकत्र लढली आहे, त्या सर्व ठिकाणी महायुतीचाच महापौर निवडून येईल.”

अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला केवळ अफवा

ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये अडीच-अडीच वर्षांच्या महापौरपदाची चर्चा सुरू असल्याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, “या सर्व विरोधकांनी पसरवलेल्या अफवा आहेत. आमची लढाई ही सत्ता आणि खुर्चीसाठी नाही, तर मुंबईच्या विकासासाठी आहे. मुंबईकरांना पुढील पाच वर्षांत काय देणार आहोत, यावर आमचं लक्ष आहे.”

नगरसेवक हॉटेलमध्ये का?

नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याबाबत स्पष्टीकरण देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “नवनिर्वाचित नगरसेवकांची पक्षाची बैठक घेण्यात आली. त्यांना पुढील पाच वर्षांत काय काम करायचं आहे, कसं काम करायचं आहे, याबाबत मार्गदर्शन केलं. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.”सध्या शिवसेना शिंदे गटाचे सर्व नगरसेवक मुंबईतील ताज लँड्स हॉटेलमध्ये मुक्कामी असून, पालिकेतील शिवसेनेचा ‘गट’ तातडीने स्थापन केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मुंबईत महायुतीचाच महापौर; शिंदेंची ठाम भूमिका

मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यांसारख्या महायुतीने एकत्र निवडणूक लढलेल्या सर्व महानगरपालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होईल, असा पुनरुच्चार एकनाथ शिंदे यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेनेचाच महापौर बसणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, “कार्यकर्त्यांची अशी भावना असू शकते. मात्र याबाबत महायुतीमध्ये चर्चा होईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

18 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

18 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

18 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

18 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

23 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

23 तास ago