शिंदोडी: चिंचणी (ता.शिरुर) येथे कृषि विभागाच्या माध्यमातून हुमणी नियंत्रणसाठी प्रकाश सापळा लावुन भुंगेरे नष्ट करण्याची मोहीम जोरदार राबविली जात असुन सामुहिक पध्दतीने हुमणी नियंत्रणसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.
ऊस क्षेत्रात हुमणी किडीचा प्रादुर्भाव होऊन ऊसाचे उत्पादन घटण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रकाश सापळा लावण्याचे आवाहन केले आहे. निर्वी येथील संजय बळवंत सोनवणे यांनी प्रतिसाद देत २५ बल्ब, २५ होल्डर आणि वायर शेतकऱ्यांना प्रकाश सापळा लावण्यासाठी मोफत दिले आहेत. तसेच अनेक शेतकरी स्वतः सापळा लावत आहे हि मोहीम शेतकऱ्यांनी हाती घेतली तरच हुमणीचा समुळ नाश होईल असे कृषी सहायक जयवंत भगत यांनी सांगितले.
चिंचणी येथे प्रकाश आबासाहेब पवार यांच्या प्रक्षेत्रात प्रकाश सापळा लावताना जयवंत भगत यांनी सर्व शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया तसेच हुमणीचे नियंत्रण करताना किडीची ओळख, भुंगा, अंडी, अळी आणि कोष या चार अवस्था असुन अळी अवस्था जमिनीवर ६ ते ८ महिने आढळून येते. तसेच या कालावधीत जास्त नुकसान ऊसाचे होत असते. तसेच नंतर कोष अवस्थेत २ ते ३ महिने हि किड जमीनीत वास्तव्यास राहुन वळवाच्या पावसानंतर भुंगेरे बाहेर येतात आणि पुन्हा अंडी घालून प्रादुर्भाव सुरु होतो आणि ऊसाचे नुकसान करतात याची माहीती दिली.
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…