Bhima river
नदीच्या पुराने दोन तालुक्यांचा संपर्क दोन दिवसापासून तुटला
शिक्रापूर: आरणगाव (ता. शिरुर) येथील वडगाव बांडे ता. दौंड या गावाच्या मध्यभागी असलेल्या भीमा नदीला सध्या सुरु असलेल्या संततधार पावसामुळे पूर आलेला असल्याने येथील भीमा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने येथील नागरिकांच्या दळणवळण चा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरणगाव (ता. शिरुर) येथील भीमा नदीवर बंधारा असून सध्या सुरु असलेल्या संततधार पावसामुळे भीमा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. भीमा नदीला आलेल्या पुरामुळे येथील नदीवरील पूल पाण्याखाली गेला. तसेच सदर बंधाऱ्याला कठडे नसल्याने येथून वाहतूक करणे धोकादायक झाले असल्याने येथून धोकादायक पद्धतीने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. मात्र येथील बंधारा पाण्याखाली गेल्याने या ठिकाणच्या शिरुर व दौंड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून येथील दुग्धव्यावसायिक व शाळकरी मुलांसह कामगार व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रस्ता वाहतुकीस बंद व वाहनचालकांवर कारवाई: संतोष लेंडे (पोलीस पाटील)
आरणगाव व वडगाव बांडेला जोडणारा भीमा नदीच्या बंधाऱ्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने सदर रस्ता बंद ठेवण्यात आलेला असून सदर पुलावरुन धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस हवालदार किशोर तेलंग व अमोल चव्हाण यांनी दंडात्मक कारवाई केली असल्याने पोलीस पाटील संतोष लेंडे यांनी सांगितले.
शिरूर (ओमकार भोरडे): शेतात ट्रॅक्टर का घातला आणि मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी…
शिरूर (ओमकार भोरडे): सामाईक इलेक्ट्रिक मोटार वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने व भावजयाने लहान…
इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचे आमिष, धमक्या आणि पोक्सोसह गंभीर कलमांखाली शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार…
शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा…
मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…
शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…