शिरूर तालुका

अॅड. उदय सरोदे यांना ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्कार’ जाहीर

सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल, ३१ ऑक्टोबर रोजी पुण्यात होणार सन्मान सोहळा

शिरूर (अरुणकुमार मोटे): उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट व डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिला जाणारा “भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्कार – २०२५” यंदा घोडनदी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. उदय सरोदे यांना जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार राष्ट्रपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त समाजसेवा, राष्ट्रीय एकता व मानवकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. पुरस्कार प्रदान समारंभ ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे येथे पार पडणार असून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अॅड. सरोदे यांचा गौरव करण्यात येणार आहे.

अॅड. उदय सरोदे हे न्हावरे फाटा (ता. शिरूर) येथे मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी निवासी विद्यालय चालवतात. शिक्षण, संस्कार आणि समाजाभिमुख मूल्ये जोपासणाऱ्या या संस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडले आहे. सामाजिक जाण, मानवतेची भावना आणि दुर्बल घटकांसाठी सातत्याने कार्य करण्याची त्यांची वृत्ती या सर्व कारणांमुळेच या प्रतिष्ठित सन्मानासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

या पुरस्कारामुळे केवळ अॅड. सरोदे यांचा नव्हे, तर घोडनदी बार असोसिएशन व शिरूर तालुक्याचा मान अधिक उंचावला आहे. स्थानिक नागरिक, सहकारी व सामाजिक संस्थांकडून अॅड. सरोदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.समाजातील उपेक्षित घटकांसाठी कार्य करणे हीच खरी देशसेवा आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल,” असे अॅड. सरोदे यांनी या प्रसंगी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

1 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

1 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

1 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

1 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

2 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

2 तास ago