शिरूर तालुका

अॅड. उदय सरोदे यांना ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्कार’ जाहीर

सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल, ३१ ऑक्टोबर रोजी पुण्यात होणार सन्मान सोहळा

शिरूर (अरुणकुमार मोटे): उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट व डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिला जाणारा “भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्कार – २०२५” यंदा घोडनदी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. उदय सरोदे यांना जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार राष्ट्रपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त समाजसेवा, राष्ट्रीय एकता व मानवकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. पुरस्कार प्रदान समारंभ ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे येथे पार पडणार असून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अॅड. सरोदे यांचा गौरव करण्यात येणार आहे.

अॅड. उदय सरोदे हे न्हावरे फाटा (ता. शिरूर) येथे मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी निवासी विद्यालय चालवतात. शिक्षण, संस्कार आणि समाजाभिमुख मूल्ये जोपासणाऱ्या या संस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडले आहे. सामाजिक जाण, मानवतेची भावना आणि दुर्बल घटकांसाठी सातत्याने कार्य करण्याची त्यांची वृत्ती या सर्व कारणांमुळेच या प्रतिष्ठित सन्मानासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

या पुरस्कारामुळे केवळ अॅड. सरोदे यांचा नव्हे, तर घोडनदी बार असोसिएशन व शिरूर तालुक्याचा मान अधिक उंचावला आहे. स्थानिक नागरिक, सहकारी व सामाजिक संस्थांकडून अॅड. सरोदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.समाजातील उपेक्षित घटकांसाठी कार्य करणे हीच खरी देशसेवा आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल,” असे अॅड. सरोदे यांनी या प्रसंगी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

3 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

9 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

9 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

9 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

10 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago