jayant-naralikar
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन झाल्यानंतर शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगीतील त्यांच्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा देण्यात आला. पुणे येथील “लोकबोधिनी” या सामाजिक संस्थेतर्फे १२ ते १४ जानेवारी १९९७ रोजी राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी “युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर” आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. वि.मा. बाचल यांच्या हस्ते झाले होते. समारोप लोकबोधिनीचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन व माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांच्या उपस्थितीत झाला होता.
शिबिरात डॉ. जयंत नारळीकर, डॉ. मुकुंद महाजन, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, डॉ. सुरेंद्र जोंधळे, प्राचार्य नंदकुमार निकम, डॉ. अनंत फडके, डॉ. संजीवनी कुलकर्णी आदी तज्ज्ञांची व्याख्याने झाली होती. शिबिरात १४ जानेवारी १९९७ रोजी आयुकाचे संचालक ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी “विज्ञान व मानवी समाज”या विषयावर व्याख्यानातून मार्गदर्शन केले.
“समाजाने आपले राहणीमान सुधारणे व आत्मिक समाधान मिळविण्यासाठी आवश्यक तेवढ्याच विज्ञान व तंत्रज्ञानाचा विचारपूर्वक वापर करावा. विज्ञानाचा वापर मानवी विनाशासाठी करायचा की रचनात्मक कामासाठी किंवा मानवी कल्याणासाठी करायचा याचा स्पष्ट निर्णय माणसाला करावा लागेल. विज्ञान आणि मानवी कल्याण तसेच विज्ञान आणि मानव यांचे दृढ नाते याची सांगड घालत अनेक उदाहरणे देऊन डॉ. नारळीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. या त्यांच्या दुर्मिळ व्याख्यानाची आठवण मात्र सर्व उपस्थितांना झाली असून सोशल मीडियावर त्यांनी डॉ. नारळीकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी शिबिर संयोजक लोकबोधिनीचे सचिव प्रा. नागनाथ शिंगाडे, प्रा. संजय देशमुख, संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी, संचालक, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, राज्यातील विविध महाविद्यालयातील सुमारे २५० विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
निमगाव म्हाळुंगी सारख्या छोट्या गावात डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारख्या ज्येष्ठ वैज्ञानिकांनी व्याख्यानातून मार्गदर्शन केले याची आठवण माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी केली आहे.
यावेळी डॉ. जयंत नारळीकर यांनी निमगाव म्हाळुंगी गावाचे कौतुक करून विविध महाविद्यालयातील आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले होते. तसेच घरी येऊन डॉ. जयंत नारळीकर व डॉ. रत्नाकर महाजन यांनी चहाचा आस्वाद घेतला होता. निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांना डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल दुःख झाले असून, एवढा मोठा वैज्ञानिक आपल्या गावात येऊन मार्गदर्शन केल्याची आठवण मात्र यावेळी सर्वांनाच झाल्याशिवाय राहिली नाही. राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन, माजी आमदार सूर्यकांत पलांडे आदींनी जुन्या आठवणींना उजाळा देत डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
– प्रा. नागनाथ शिंगाडे
पहेलगाम हल्ला! निमगाव म्हाळुंगीमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च, रॅली…
निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचांनी गावातील युवक-युवतींना घडवले मोफत रायगड दर्शन!
राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…
मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…
मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…
चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…