शिरूर तालुका

डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनानंतर निमगाव म्हाळुंगीतील त्यांच्या आठवणींना उजाळा…

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन झाल्यानंतर शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगीतील त्यांच्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा देण्यात आला. पुणे येथील “लोकबोधिनी” या सामाजिक संस्थेतर्फे १२ ते १४ जानेवारी १९९७ रोजी राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी “युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर” आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. वि.मा. बाचल यांच्या हस्ते झाले होते. समारोप लोकबोधिनीचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन व माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांच्या उपस्थितीत झाला होता.

शिबिरात डॉ. जयंत नारळीकर, डॉ. मुकुंद महाजन, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, डॉ. सुरेंद्र जोंधळे, प्राचार्य नंदकुमार निकम, डॉ. अनंत फडके, डॉ. संजीवनी कुलकर्णी आदी तज्ज्ञांची व्याख्याने झाली होती. शिबिरात १४ जानेवारी १९९७ रोजी आयुकाचे संचालक ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी “विज्ञान व मानवी समाज”या विषयावर व्याख्यानातून मार्गदर्शन केले.

“समाजाने आपले राहणीमान सुधारणे व आत्मिक समाधान मिळविण्यासाठी आवश्यक तेवढ्याच विज्ञान व तंत्रज्ञानाचा विचारपूर्वक वापर करावा. विज्ञानाचा वापर मानवी विनाशासाठी करायचा की रचनात्मक कामासाठी किंवा मानवी कल्याणासाठी करायचा याचा स्पष्ट निर्णय माणसाला करावा लागेल. विज्ञान आणि मानवी कल्याण तसेच विज्ञान आणि मानव यांचे दृढ नाते याची सांगड घालत अनेक उदाहरणे देऊन डॉ. नारळीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. या त्यांच्या दुर्मिळ व्याख्यानाची आठवण मात्र सर्व उपस्थितांना झाली असून सोशल मीडियावर त्यांनी डॉ. नारळीकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी शिबिर संयोजक लोकबोधिनीचे सचिव प्रा. नागनाथ शिंगाडे, प्रा. संजय देशमुख, संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी, संचालक, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, राज्यातील विविध महाविद्यालयातील सुमारे २५० विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

निमगाव म्हाळुंगी सारख्या छोट्या गावात डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारख्या ज्येष्ठ वैज्ञानिकांनी व्याख्यानातून मार्गदर्शन केले याची आठवण माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी केली आहे.

यावेळी डॉ. जयंत नारळीकर यांनी निमगाव म्हाळुंगी गावाचे कौतुक करून विविध महाविद्यालयातील आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले होते. तसेच घरी येऊन डॉ. जयंत नारळीकर व डॉ. रत्नाकर महाजन यांनी चहाचा आस्वाद घेतला होता. निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांना डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल दुःख झाले असून, एवढा मोठा वैज्ञानिक आपल्या गावात येऊन मार्गदर्शन केल्याची आठवण मात्र यावेळी सर्वांनाच झाल्याशिवाय राहिली नाही. राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन, माजी आमदार सूर्यकांत पलांडे आदींनी जुन्या आठवणींना उजाळा देत डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

– प्रा. नागनाथ शिंगाडे

पहेलगाम हल्ला! निमगाव म्हाळुंगीमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च, रॅली…

निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचांनी गावातील युवक-युवतींना घडवले मोफत रायगड दर्शन!

निमगाव म्हाळुंगी येथील माजी सैनिकांनी जपला माणुसकीचा झरा…

निमगाव म्हाळुंगीमध्ये तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

2 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

2 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

3 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

3 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

8 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

8 तास ago