शिरूर तालुका

शिरूर बसस्थानकातील विविध समस्या सोडवण्यासाठी भाजपा महिला आघाडीचे निवेदन

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर बसस्थानकात अनेक समस्या असल्याने प्रवाशांना येथील समस्यांचा सामना करावा लागत असून तातडीने या समस्या सोडवाव्यात अन्यथा भाजपा महिला आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रिया बिरादार यांनी आगार व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. यावेळी भाजप अल्पसंख्याक महिला आघाडीच्या शहराध्यक्षा कोमल भगवे, उपाध्यक्षा सृष्टी करंजुले,ओबीसी शहराध्यक्षा सुशीला गोसावी,नितु शर्मा,सुषमा फंड,राजेंद्र महाजन, प्रितेश फुलडाळे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

शिरूर बसस्थानकात विविध समस्या असल्याने प्रवाशांची, वृध्दांची,महिलांची तसेच शालेय विद्यार्थ्यांना येथील समस्यांचा सामना करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यातदेखील बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नसुन पाणपोई महिला स्वच्छतागृहाशेजारी करण्यात आली आहे परंतु तेथे पाण्याची सोय नसणे,फलाटवर बस वेळेवर न लागणे,वारंवार बस नादुरुस्त असणे,प्रवासात बस मध्येच बंद पडणे,अचानक बस रद्द होणे,बस स्थानक परिसरात व स्वच्छतागृहात अस्वच्छता,स्वच्छतागृहामध्ये महिलांना पैशाची मागणी करणे,बस स्थानकात बस आत येण्या – बाहेर जाण्यासाठी एकच मार्ग असुन त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले,याच मार्गावर नादुरुस्त बस उभ्या असणे,बसस्थानकात महिलांच्या सुरक्षिततेसाठी होमगार्ड चंदाताई चांगले काम करीत आहे परंतु त्यांच्याबरोबर आणखी दोन पोलीस कॉन्स्टेबल असावे. यांसारख्या विविध समस्यांचे लवकरात लवकर सोडविण्यात येऊन प्रवासांची होणारी गैरसोय टाळावी अन्यथा भाजपा महिला आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन देण्यासाठी आलेल्या सर्व भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापक मनिषा गायकवाड व बसस्थानक प्रमुख भैरवनाथ दळवी यांना घेऊन बसस्थानक परिसरातील विविध समस्या समक्ष फिरून दाखवल्या व त्याठिकाणीच निवेदन देण्यात आले

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

9 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

16 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

16 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

16 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

16 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

18 तास ago