शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यपातळीवर घवघवीत यश मिळवत संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
इयत्ता दुसरी मधील कृष्णा रामचंद्र देशमुख याने १४४ गुण मिळवत संपूर्ण राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. शिवण्या अजित पडवळ याने १३८ गुण मिळवत राज्यात सातवा आणि पुणे जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. त्याचबरोबर अनुष्का मंगेश पोखरकर (१२८ गुण), आरोही योगेश पडवळ (१२६ गुण), दुर्वा प्रदीप पडवळ (११८ गुण) आणि राजवीर अविनाश पडवळ (१०८ गुण) यांनी देखील चांगले यश मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक लहू मनाजी शितोळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
इयत्ता तिसरीतील साईराज सुभाष पडवळ याने २४२ गुण मिळवले असून कृष्णा राहुल मिंडे याने २१६ गुण प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे वर्गशिक्षक दत्तात्रय अनंतराव चिकटे सर यांनी मार्गदर्शन केले.
इयत्ता चौथीतील आर्यन रमेश पडवळ याने २१४ गुण प्राप्त करून उल्लेखनीय कामगिरी बजावली. या यशस्वी विद्यार्थ्याला वर्गशिक्षक रमेश भाऊ बोखारे यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व विद्यार्थ्यांना श्री. गणेश बाळू पवार सर यांचेही बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल केंद्रप्रमुख सखाराम फंड सर, विस्तार अधिकारी, तसेच गटशिक्षणाधिकारी मा. बाळकृष्ण कळमकर साहेब यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
शाळेच्या या अभूतपूर्व यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भोर, सर्व सदस्य तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्यावर अभिमान व्यक्त केला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…
मुंबई : राज्यातील जमिनीच्या आणि मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि मालकी हक्क अधिक बळकट करण्यासाठी…
रात्रीचं जागरण, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता…