शिरूर तालुका

टाकळी हाजी येथे बैलाचा दशक्रिया विधी संपन्न…

शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी येथील साबळे वाडीतील पोपट कोंडीबा साबळे यांनी त्यांच्या राजा या बैलाचा दशक्रिया विधी सोमवारी (दि. १३) संपन्न केला.

साबळे यांच्या घरच्या गायी कडून जन्म झालेल्या गोऱ्हयाने शर्यतीमध्ये भाग घेवून अनेक घाट गाजविले आहेत. 24 वर्षे वयाच्या घरातील एक सदस्याचे (राजा बैलाचे) 10 दिवसांपूर्वी निधन झाल्याने त्यांनी हिंदू धर्म परंपरेने मनुष्याच्या विधिप्रमाने दशक्रिया विधी संपन्न केला. घाटाचा राजा हा किताब या बैलामुळे साबळे यांच्या बैलगाड्यास अनेकदा मिळाला आहे.

पाळीव प्राण्यांविषयची आस्था जोपासत आजही शेतकरी प्राणी मात्रांवर जीवापाड प्रेम करत आहेत. यांत्रिक युगात जरी शेती सुधारित पद्धतीने केली जात असली तरी बैलगाडा शर्यती सुरू झाल्याने शर्यतीचे बैल म्हणजे शेतकऱ्यांची मोठी संपत्ती मानली जात आहे.

यावेळी टाकळी हाजी चे सरपंच दामुशेठ घोडे, बैलगाडा विमा कंपनीचे शिरूर आंबेगाव चे उपाध्यक्ष बन्सीशेठ घोडे, माजी उपसरपंच सखाराम खामकर, सामाजिक कार्यकर्ते अंकुश उचाळे, अंकुश शितोळे, सोसायटीचे माजी उपाध्यक्ष अशोक मेचे, बैलगाडा मालक आणि शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…

13 तास ago

शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…

15 तास ago

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…

16 तास ago

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…

16 तास ago

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

18 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

18 तास ago