महाराष्ट्र

हर्सूलमध्ये पाडापाडी सुरु, वाहतूक ४ दिवस बंद राहणार; या मार्गे वाहतूक वळवली…

बीड: औरंगाबाद शहर ते सिल्लोड राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. आज सकाळपासून हर्सूल येथील संपादित मालमत्ता बांधकाम पाडण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यामुळे हर्सूल गावातून वाहतूक चार दिवस बंद करण्यात आली आहे.

हर्सूल गावातील संपादित होणाऱ्या मालमत्ता बांधकाम पाडण्याची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १० फेब्रुवारीला जी २० च्या निमित्ताने झालेल्या बैठकीत दिले. त्यानुसार सोमवार (दि. १३) ते गुरुवारपर्यंत चार दिवस भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. दरम्यान, आज सकाळी गावातील मालमत्ता पाडापाडीचे काम सुरु झाले आहे. काही बाधित मालमत्ता मधील सामान नागरिकांनी स्वतःहून रविवारी काढून घेतले.

चार दिवस वाहतूक राहणार बंद

हर्सूल गावात येणारा व गावातून सावंगीकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

या मार्गे करता येणार वाहतूक…

औरंगाबाद शहरातून हर्सूल गावातून फुलंब्रीकडे जाणारी वाहतूक हर्सूल टी पॉईंटवरून आंबेडकरनगर चौक ते पिसादेवी बायपास अशी पुढे जाईल. फुलंब्री, सिल्लोडकडून हर्सूल गावात येणारी 1 वाहतूक सावंगी नाका येथून वळवून सावंगी बायपास मार्गे नारेगाव, वोखार्ड टी अशी पुढे जाईल. या सूचना अत्यावश्यक सेवा असलेल्या वाहनांसाठी लागू असणार नाहीत, असे सिडको वाहतूक शाखेचे निरीक्षक राजेश मयेकर यांनी कळविले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

4 मिनिटे ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

20 मिनिटे ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

26 मिनिटे ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

28 मिनिटे ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

2 तास ago

ऑपरेशन टायगर! उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का? सहा खासदारांच्या फुटीची चर्चा, ओमराजे निंबाळकर दिल्लीत

दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील…

2 तास ago