शिरूर तालुका

रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने “महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक” पुरस्काराचे वितरण

शिरुर (तेजस फडके): छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी देह झिजवणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य महान होते. त्यांनी जर त्या काळी सावित्रीबाई फुले यांना शिकवले नसते. तर आज मुली शिकल्या नसत्या, त्यांनी सावित्रीबाई यांना खंबीरपणे समाजाच्या विरोधात जाऊन साथ दिली. त्यामुळेच आज महिला सुशिक्षित आहेत. सध्याच्या काळात प्रत्येक पुरुषाने आपल्या मुलींना शिकवले पाहिजे. जेव्हा सर्व मुली सुशिक्षित होतील, तेव्हाच त्यांची जयंती खऱ्या अर्थाने साजरी होईल असे प्रतिपादन रामलिंग महीला उन्नती बहूउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी केले.

मंगळवार (दि 11) रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त शिरुर येथील नगरपालिका शाळा क्र.5,मुंबई बाजार, या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. तसेच शाळेतील शिक्षक भानुदास हंबिर सर यांना “महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार” देण्यात आला. यावेळी शाळेतील मुलांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यकर्तृवाविषयी माहिती दिली. यावेळी रवींद्र खांडरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पत्रकार किरण पिंगळे, उषा वेताळ, अंजली माने, नंदा वेताळ, वंदना भोसले, समिधा यादव, कुसुम लांबी, धनंजय जाधव तसेच शिक्षक वृंद सर्व उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांचे अजिज पठाण यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…

1 तास ago

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

2 तास ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

2 तास ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

3 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

20 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

1 दिवस ago