शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात विजेचा करंट लागून आठ मेढयांचा मृत्यू

सुदैवाने मेंढपाळ व त्याची आजी बचावली

सविंदणे: आण्णापूर (ता. शिरुर) या गावात विद्युत तार तुटल्यामुळे आणि बेकायदेशीर आकड्यामुळे वायर मधून विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली असून यात मेंढपाळाच्या जवळपास ७ ते ८ मेंढयांचा मृत्यू झाला आहे. अविनाश माळी रा. आण्णापूर या मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने अविनाश व त्याची आजी इंदूबाई माळी यांचा विजेच्या करंटने लांब फेकल्याने दैव बलवत्तर म्हणूण जीव वाचला आहे.

विद्युत तार तुटल्यामुळे आणि आकड्यामुळे आर्थिंग मधून विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचे मेंढपाळांनी सांगितले . मेंढपाळालाही विद्युत करंट लागला होता. परंतु त्यांना लांब फेकल्यामुळे ते बचावले गेले असे त्यांनी सांगितले. सदर प्रकरणी महावितरणने सर्व सखोल चौकशी करुन मेंढपाळाला मदत करावी, अशी मागणी परीसरातील नागरीक करत आहे.

शिरुर तालुक्यातील रांजणगाव सांडस (ता. शिरुर) या ठिकाणी महीनाभरापुर्वी भिमानदीकाठी मोटारीचा विदयुत प्रवाह नदीपात्रात उतरल्याने गाई पाणी पिण्यासाठी गेल्या असता ६ गायांचा मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे इतर गाई वाचल्या होत्या. तसेच अनेक ठिकाणी विदयुत तारा जीर्ण झाल्या असून त्या बदलण्यासाठी महावितरणची उदासीनता दिसून येत असून महीनाभरात ही दुसरी घटना आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

1 दिवस ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

2 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

3 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

3 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

6 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago