शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात विजेचा करंट लागून आठ मेढयांचा मृत्यू

सुदैवाने मेंढपाळ व त्याची आजी बचावली

सविंदणे: आण्णापूर (ता. शिरुर) या गावात विद्युत तार तुटल्यामुळे आणि बेकायदेशीर आकड्यामुळे वायर मधून विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली असून यात मेंढपाळाच्या जवळपास ७ ते ८ मेंढयांचा मृत्यू झाला आहे. अविनाश माळी रा. आण्णापूर या मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने अविनाश व त्याची आजी इंदूबाई माळी यांचा विजेच्या करंटने लांब फेकल्याने दैव बलवत्तर म्हणूण जीव वाचला आहे.

विद्युत तार तुटल्यामुळे आणि आकड्यामुळे आर्थिंग मधून विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचे मेंढपाळांनी सांगितले . मेंढपाळालाही विद्युत करंट लागला होता. परंतु त्यांना लांब फेकल्यामुळे ते बचावले गेले असे त्यांनी सांगितले. सदर प्रकरणी महावितरणने सर्व सखोल चौकशी करुन मेंढपाळाला मदत करावी, अशी मागणी परीसरातील नागरीक करत आहे.

शिरुर तालुक्यातील रांजणगाव सांडस (ता. शिरुर) या ठिकाणी महीनाभरापुर्वी भिमानदीकाठी मोटारीचा विदयुत प्रवाह नदीपात्रात उतरल्याने गाई पाणी पिण्यासाठी गेल्या असता ६ गायांचा मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे इतर गाई वाचल्या होत्या. तसेच अनेक ठिकाणी विदयुत तारा जीर्ण झाल्या असून त्या बदलण्यासाठी महावितरणची उदासीनता दिसून येत असून महीनाभरात ही दुसरी घटना आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

5 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

6 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

11 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

11 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

11 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

12 तास ago