शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील शासकीय ओढ्याला पावसाच्या पाण्याने पूर आल्याने ओढा फुटून पाणी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेतातील सोयाबीन सह पेरुच्या बागेचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
हिवरे कुंभार (ता. शिरुर) सह परिसरात 2 दिवस पाऊस झाल्याने परिसरातील ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. परिसरात अनेक ठिकाणी ओढ्याला पूर येऊन काही ठिकाणी ओढे फुटून ओढ्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेले असून येथील शंकर गायकवाड या शेतकऱ्याच्या शेतात ओढ्याचे पाणी शिरुर पेरुच्या तब्बल 200 झाडांसह सोयाबीनचे पिक पाण्यात गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
एकीकडे शेतकरी बाजार भाव व पावसामुळे होणाऱ्या नुकसान मुळे मोठ्या अडचणीत सापडलेला असताना गायकवाड यांच्या शेतातील पिकांच्या झालेल्या नुकसानी मुळे ते हवालदिल झाले आहेर तर यापूर्वी देखील शेतात अशाच पद्धतीने पाणी शिरल्याने महसूल विभागाकडे याबाबत तक्रार देऊन देखील त्यांनी काहीच उपाययोजना केली नसल्याने गायकवाड पुन्हा अडचणीत सापडले असून शासनाने आता तरी दखल घेऊन ओढ्यातील पाणी शेतात न जाण्याबाबत काही उपाययोजना करुन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी शंकर गायकवाड यांनी केली आहे.
हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील शंकर गायकवाड या शेतकऱ्याच्या नुकसानीबाबत हिवरे कुंभारच्या तलाठी अनुजा घुगे यांच्याशी फोनवर वारंवार संपर्क साधला असता तलाठी अनुजा घुगे यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…