शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील शासकीय ओढ्याला पावसाच्या पाण्याने पूर आल्याने ओढा फुटून पाणी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेतातील सोयाबीन सह पेरुच्या बागेचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
हिवरे कुंभार (ता. शिरुर) सह परिसरात 2 दिवस पाऊस झाल्याने परिसरातील ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. परिसरात अनेक ठिकाणी ओढ्याला पूर येऊन काही ठिकाणी ओढे फुटून ओढ्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेले असून येथील शंकर गायकवाड या शेतकऱ्याच्या शेतात ओढ्याचे पाणी शिरुर पेरुच्या तब्बल 200 झाडांसह सोयाबीनचे पिक पाण्यात गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
एकीकडे शेतकरी बाजार भाव व पावसामुळे होणाऱ्या नुकसान मुळे मोठ्या अडचणीत सापडलेला असताना गायकवाड यांच्या शेतातील पिकांच्या झालेल्या नुकसानी मुळे ते हवालदिल झाले आहेर तर यापूर्वी देखील शेतात अशाच पद्धतीने पाणी शिरल्याने महसूल विभागाकडे याबाबत तक्रार देऊन देखील त्यांनी काहीच उपाययोजना केली नसल्याने गायकवाड पुन्हा अडचणीत सापडले असून शासनाने आता तरी दखल घेऊन ओढ्यातील पाणी शेतात न जाण्याबाबत काही उपाययोजना करुन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी शंकर गायकवाड यांनी केली आहे.
हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील शंकर गायकवाड या शेतकऱ्याच्या नुकसानीबाबत हिवरे कुंभारच्या तलाठी अनुजा घुगे यांच्याशी फोनवर वारंवार संपर्क साधला असता तलाठी अनुजा घुगे यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…