शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील शासकीय ओढ्याला पावसाच्या पाण्याने पूर आल्याने ओढा फुटून पाणी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेतातील सोयाबीन सह पेरुच्या बागेचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
हिवरे कुंभार (ता. शिरुर) सह परिसरात 2 दिवस पाऊस झाल्याने परिसरातील ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. परिसरात अनेक ठिकाणी ओढ्याला पूर येऊन काही ठिकाणी ओढे फुटून ओढ्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेले असून येथील शंकर गायकवाड या शेतकऱ्याच्या शेतात ओढ्याचे पाणी शिरुर पेरुच्या तब्बल 200 झाडांसह सोयाबीनचे पिक पाण्यात गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
एकीकडे शेतकरी बाजार भाव व पावसामुळे होणाऱ्या नुकसान मुळे मोठ्या अडचणीत सापडलेला असताना गायकवाड यांच्या शेतातील पिकांच्या झालेल्या नुकसानी मुळे ते हवालदिल झाले आहेर तर यापूर्वी देखील शेतात अशाच पद्धतीने पाणी शिरल्याने महसूल विभागाकडे याबाबत तक्रार देऊन देखील त्यांनी काहीच उपाययोजना केली नसल्याने गायकवाड पुन्हा अडचणीत सापडले असून शासनाने आता तरी दखल घेऊन ओढ्यातील पाणी शेतात न जाण्याबाबत काही उपाययोजना करुन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी शंकर गायकवाड यांनी केली आहे.
हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील शंकर गायकवाड या शेतकऱ्याच्या नुकसानीबाबत हिवरे कुंभारच्या तलाठी अनुजा घुगे यांच्याशी फोनवर वारंवार संपर्क साधला असता तलाठी अनुजा घुगे यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…
मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…
शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…