शिरुर (तेजस फडके) ग्रामीण भागातील महिलांना डिजिटलदृष्ट्या सक्षम करून आर्थिक स्वावलंबनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘आयटीसी मिशन सुनहरा कल आणि बायफ संस्था पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिरुर येथे “डिजिटल आर्थिक साक्षरता मास्टर ट्रेनर प्रशिक्षण” यशस्वीपणे पार पडले. या प्रशिक्षणात विविध गावांमधील तब्बल ३० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
त्यामुळे शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिलांच्या हातात डिजिटल तंत्रज्ञान येऊन आर्थिक स्वावलंबनाच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. या उपक्रमाअंतर्गत महिलांना ‘ई दोस्त’ कार्यक्रमाबद्दल बायफ संस्थेच्या कार्यक्रम व्यवस्थापक पुजा माजगणकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ‘ई दोस्त’ हा उपक्रम महिलांना डिजिटल सेवा पुरवणारे “डिजिटल दूत” बणवुन ग्रामीण भागात तंत्रज्ञान सुलभ करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे.
दरम्यान, Department of Science and Technology (DOST) तर्फे महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी ACCORD (कृत्रिम बुद्धिमत्ता), ASCENT (स्वयंचलित प्रणाली), CONNECT (नेटवर्क) आणि THRIVE (संशोधन) अशा अत्याधुनिक योजनांची २०२५ मध्ये सुरुवात करण्यात आली आहे. या योजनांचा उद्देश महिलांना तंत्रज्ञानाशी जोडून आत्मनिर्भरतेकडे नेणे हा आहे.
या कार्यक्रमासाठी सुहास गवांदे, गणेश शेवाळे, कृषी सहाय्यक ज्योती भिटे, गजानन पाटील, किरण सालके, आयटीसी अधिकारी सायली कदम व नियर बाय कंपनीचे सचिन धुमाळ उपस्थित होते. त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर कसा क्रांतिकारी ठरु शकतो याबाबत मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात महिलांना डिजिटल आर्थिक व्यवहार, तिकीट बुकिंग, लोन सुविधा, मायक्रो एटीएम, क्यूआर कोड, यूपीआय व्यवहार, पेमेंट यंत्रणा आदी डिजिटल कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
शिरुर; विद्युत वाहिनीवर बेकायदेशीर जाहिरात फलक; महावितरणची पोलिसांकडे तक्रार
Video; मुसळधार पाऊसात विजेच्या खांबावर लटकावला बॅनर, महावितरण कारवाई करणार का…?
शिरुर तालुक्यात कंपनीतुन तब्बल १६ लाखांची कॉपर ट्यूब चोरी; औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह…?
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…
मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…
मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…
बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…
मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…