शिरूर तालुका

श्री संभाजीराजे विद्या संकुलात ‘हर घर तिरंगा’ अभियान…

शिक्रापूरः ‘देशाच्या तिरंग्याच्या सन्मानासाठी, उत्तुंग धैर्य आणि अभिमान याव्दारे क्रांतिकारकांचे बलीदान विसरता येणे कदापि शक्य नाही. प्रत्येक भारतीयांच्या हृदयात देशभक्ति जागृत करणे, राष्ट्रध्वजा बद्दल जागरूकता वाढविणे हाच ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे,’ असे प्रतिपादन बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी श्री संभाजीराजे विद्या संकुलात ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या निमित्ताने केले.

जातेगांव बु॥ (ता. शिरूर) येथील श्री संभाजीराजे विद्या संकुलात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमांतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियानास सुरुवात प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जातेगाव बुद्रुकचे सरपंच किशोर खळदकर, उपसरपंच गणेश उमाप, केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, प्राचार्य रामदास थिटे, सामाजीक कार्यकर्ते अप्पासाहेब मोरे व विद्यालयीन शिक्षक वृंद उपस्थित होते.

दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट नुसार संपन्न होणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाविषयी प्रास्ताविकात प्राचार्य रामदास थिटे म्हणाले, ‘भारत सरकार व्दारा देश व तिरंगा ध्वज याच्या सन्मानासाठी गावातील प्रत्येक घरावर तिरंगा उपक्रम म्हणजे अभिमान, सन्मान धैर्य आणि प्रेरणेचे प्रतिक आहे. स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असताना महात्मा गांधीच्या साबरमती आश्रमापासून ७५ आठवड्यांसाठी, देशातील ७५ ठिकाणी स्वातंत्र्य लढयातील ७५ महत्वाच्या घटनांची आठवण यानिमित्ताने केली जात आहे.’

यानिमित्ताने विद्यालयीन विद्यार्थ्यानी तिरंगा ध्वज, अमृतमहोत्सव घोषणा, प्रभातफेरी, पोस्टर प्रदर्शन, विविध स्पर्धा, गाव व विद्यालयीन स्वच्छता, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रमाचे आयोजन करणेकामी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

7 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

7 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

7 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

8 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

8 तास ago

बारावी निकाल 89.79% : यशस्वी विद्यार्थ्यांचे दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन

आवडीनुसार पुढील वाटचालीचे आवाहन; मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा 6.35% अधिक मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12…

8 तास ago