सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांची शासनाला घणाघाती मागणी
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौजे अन्नापुर येथे पुन्हा एकदा बिबट्याने थैमान घातले. १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळच्या सुमारास मेंढपाळ मोहन दामू चोरमले (वय ५०) आणि त्यांचा मुलगा सोनबा मेंढरे चारत असताना, ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक एक मेंढी फस्त केली. धाडसी प्रतिकार करून सोनबा यांनी आरडाओरड, दगडफेक करत बिबट्याला हुसकावून लावले, मात्र तोपर्यंत त्या मेंढीला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे सुमारे १३-१४ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, दूध पिणाऱ्या पिल्लाचे करुण विलाप हृदयद्रावक होता.
घाबरलेल्या अवस्थेत मेंढपाळाने शिरूर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी सामाजिक कार्यकर्ते निलेश मंदा यशवंत वाळुंज यांना संपर्क केला. तत्काळ प्रतिसाद देत वाळुंज यांनी शिरूर वनपरीक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी कर्मचारी पाठवले गेले.
बिबट्यांचे वाढते हल्ले पाहता, अन्नापुरसह शिरूर तालुक्यात तातडीने प्रतिबंधक उपाययोजना करण्यात याव्यात. मनुष्यहानी झाल्यास बाधित कुटुंबातील एकास तत्काळ शासन सेवेत भरती करण्यात यावे.बिबट प्रवण क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाला ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच लागू करावे. हल्ल्यांमध्ये अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास वैद्यकीय खर्च व कुटुंबीयांचे पुनर्वसन व्हावे.”घरांभोवती मोफत तारेची कुंपण योजना राबवावी. पकडलेल्या बिबट्यांना इतर राज्यांतील अभयारण्यात हलवावे.” या विषयावर ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे. शासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर जनआंदोलनाचा इशारा वाळुंज यांनी दिला आहे.
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…
मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…
खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…