शिरूर तालुका

रोजच्या आहारात ज्वारी व बाजरीचे सेवन करणे वाढवा; डॉ ऐश्वर्या आगरकर

शिरुर (तेजस फडके): आपल्या शरीरात ग्लुटेन जास्त गरजेचे नसुन ग्लुटेन विरहीत तृणधान्याचे रोजच्या आहारात प्रमाण वाढल्यास भविष्यात आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होईल. त्यामुळे आहारात ज्वारी व बाजरी हंगाम निहाय वाढवा असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ ऐश्वर्या आगरकर यांनी केले.

निमोणे (ता. शिरुर) येथील श्री नागेश्वर विद्यालयात शिरुर तालुका कृषी अधिकारी कार्यालय, निमोणे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच श्री नागेश्वर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत पौष्टिक तृणधान्य चौरस आहाराचे महत्त्व या विषयाच्या अनुषंगाने कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या डब्यात भाकरी आढळून आल्या त्या सर्व विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व विकास हे पुस्तक व इतर शालेय वस्तू देण्यात आल्या. यावेळी कृष्णा कांबळे आदित्य काळे, राजनंदिनी गायकवाड,रोहीत काळे, सार्थक पवार,यश पवार, राधिका आयवळे, आश्विनी भगुरे, मयुर काळे या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच संजय काळे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ इंदिरा डॅनियल, डॉ ऐश्वर्या आगरकर आरोग्य सहायक डी एन मारणे, आरोग्य सहायिका कोरेकर नागेश्वर विद्यालयातील मुख्याध्यापक अनिल शिरगिरे, प्रफुल्ल सरवदे, अंकुश वाघसर, कनिलाल पाटील,राजाराम ढवळे, शरद दुर्गे, सुभाष सोनवणे, तसेच कृषी विभागचे कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे, कृषी सहायक जयवंत भगत, सुनिल नाईक, मोनिका झगडे ग्रामस्थ अनिल जाधव सह इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत चे विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल सरवदे, प्रास्ताविक कृषी सहायक जयवंत भगत, तर कार्यक्रमाचे आभार राजाराम ढवळे यांनी मानले. शाळेचे शिक्षक वाघ, ढवळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे यांनी योगदान दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

11 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

15 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

15 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

15 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

15 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

15 तास ago