शिरूर तालुका

पाबळ मध्ये वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी

वनविभाग व प्राणी मित्रांच्या सतर्कतेने बिबट्या उपचारासाठी दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे थापेवाडी मध्ये बेल्हा जेजुरी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी झाला असताना वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या सतर्कतेने बिबट्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पाबळ (ता. शिरुर) येथील थापेवाडी येथे बेल्हा जेजुरी महामार्गावर २६ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्याला अज्ञात वाहनाची धडक बसून बिबट्या जखमी झाला याबाबतची माहिती शिरुर वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना मिळताच वनपाल गणेश पवार, वनरक्षक ऋषिकेश लाड, अभिजित सातपुते, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख, पोलीस नाईक विशाल देशमुख, आंबेगाव वनविभागाच्या वनरक्षक साईमाला गिते, वाममजूर बाळू आदक, प्रवीण मांदळे यांसह आदींनी सदर ठिकाणी धाव घेत जखमी बिबट्याला शिताफीने ताब्यात घेऊन त्याला उपचारासाठी माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात उपचारासाठी हलविले.

दरम्यान बिबट्यावर सदर ठिकाणी उपचार सुरु करण्यात आले असून वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या तत्परतेने बिबट्यावर उपचार सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

1 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

1 तास ago

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…

6 तास ago

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…

6 तास ago

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…

6 तास ago

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

23 तास ago