शिक्रापूर: बुरुंजवाडी (ता. शिरूर) येथे सकाळच्या सुमारास दुर्मिळ गव्हाणी घुबडावर कावळ्यांचा हल्ला सुरु असताना घुबडाची कावळ्यांच्या तावडीतून सुटका करून जीवदान देण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे.
बुरुंजवाडी (ता. शिरूर) येथे आज सकाळच्या सुमारास 25 ते 30 कावळे घुबडावर हल्ला करत असल्याचे शरद टेमगिरे व सागर रुके यांना दिसून आले. त्यांनी तातडीने निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती देत घुबडाला कावळ्यांच्या हल्ल्यातून संरक्षण दिले. दरम्यान निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख व अमोल कुसाळकर यांनी सदर ठिकाणी धाव घेत पा-हणी केली असता तेथे एक दुर्मिळ गव्हाणी घुबडावर कावळ्यांनी हल्ला केल्याचे दिसून आले.
यावेळी शेरखान शेख व अमोल कुसाळकर यांनी शिताफीने सदर दुर्मिळ गव्हाणी घुबडाला ताब्यात घेतले यावेळी शरद टेमगिरे, सागर रुके यांसह आदी उपस्थित होते, तर त्या घुबडाची पाहणी केली असता घुबड व्यवस्थित असल्याचे निदर्शनास आले.
याबाबतची माहिती शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरीमंडळ अधिकारी गौरी हिंगणे, नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांना माहिती देण्यात आली असून त्या दुर्मिळ घुबडाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात येणार असल्याचे अमोल कुसाळकर यांनी सांगितले.
सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…
आजकाल शरीरात यूरिक अॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…
पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…
मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…