४५ महिला व ३५ पुरुषांचीही यशस्वी शोधमोहीम
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत संवेदनशील व कौतुकास्पद अशी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. जानेवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत शिरूर पोलीस ठाणे हद्दीतून घरातून निघून गेलेल्या १३ अल्पवयीन बालिकांचा यशस्वी शोध घेण्यात आला असून त्यांना सुखरूप त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या सर्व गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी अत्यंत तत्परता आणि सजगतेने काम करत तांत्रिक विश्लेषण, बातमीदारांची मदत व सखोल तपासाच्या माध्यमातून ही कामगिरी पार पाडली. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी हे मिशन पूर्ण केले. याच कालावधीत शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतून ४५ महिला व ३५ पुरुष बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या.
सदर प्रकरणांची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक केंजळे यांच्या आदेशानुसार एक विशेष मिसिंग शोध पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलीस हवालदार संपत खबाले, अंमलदार सोनाजी तावरे, आकाश नेमाणे, पवन तायडे आणि महिला पोलीस अंमलदार सारिका माळी यांचा समावेश होता. या पथकाने एक महिन्याच्या कालावधीत कसून शोधमोहीम राबवून सर्व ८० नागरिकांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सोपवले. या संपूर्ण यशस्वी मोहिमेमध्ये पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले तसेच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शन लाभले. या मोहिमेत पुढील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
पो.उपनिरीक्षक: शुभम चव्हाण पो.हवालदार: नाथसाहेब जगताप, संपत खबालेपो.अंमलदार: विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, अजय पाटील, रविंद्र आव्हाड, महिला अंमलदार: भाग्यश्री जाधव, मोनीका वाघमारे, प्रतिभा देशमुख, स्नेहल होळकर, गोदावरी धंदरे, परवीन पप्पुवाले, गीता सुळे, सारिका माळी शिरूर पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता, दक्षता आणि मानवी मूल्यांशी बांधिलकी हे समाजासाठी एक आदर्श ठरणारे आहे. बालकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच नागरिकांच्या पुनश्च संपर्कासाठी शिरूर पोलीस ठाण्याचे हे कार्य निश्चितच कौतुकास पात्र आहे.
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…
मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…
खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…