शिरूर तालुका

कळवंतवाडीच्या समृद्धी चव्हाण हिचं नेमबाजीतील सुवर्ण यश

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड; शिरूर तालुक्याचा अभिमान

शिरूर (अरुणकुमार मोटे): नेवासा फाटा, अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या शालेय विभागीय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ मध्ये शिरूर तालुक्यातील कळवंतवाडी गावच्या समृद्धी अजय चव्हाण हिने थक्क करणारी कामगिरी करत १० मीटर पिप साईट एअर रायफल प्रकारात ४०० पैकी तब्बल ३९८ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. या चमकदार कामगिरीच्या जोरावर तिने नागपूर येथे २६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ साठी पात्रता मिळवली असून, शिरूर तालुक्याचा लौकिक वाढवला आहे.

अतिशय कमी कालावधीत उल्लेखनीय यश मिळवत समृद्धीने नेमबाजी क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. केवळ दीड वर्षांच्या अथक परिश्रमानंतर तिने भारतीय संघ निवड चाचणी स्पर्धेपर्यंत मजल मारली, ही तिच्या जिद्दीची आणि निष्ठेची साक्ष देणारी बाब आहे.

याआधी तिने उत्तराखंड, भोपाळ, दिल्ली, केरळ आणि पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चाचणी, राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून, तिची कामगिरी सातत्याने उजवी ठरली आहे.

समृद्धीला शिरूर येथील युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक शरद तरटे यांचे तज्ज्ञ मार्गदर्शन लाभत आहे. तसेच तिच्या आई-वडिलांचा आणि कुटुंबीयांचा प्रोत्साहनपर पाठिंबा हे तिच्या यशामागील प्रमुख बळ मानले जाते.

समृद्धीच्या या यशाबद्दल शिरूर तालुका तसेच कळवंतवाडी परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

“समृद्धीने मेहनतीच्या जोरावर नेमबाजी क्षेत्रात अल्पावधीत उत्तुंग झेप घेतली आहे. तिच्याकडून भविष्यात भारतीय संघात प्रतिनिधित्वाची अपेक्षा आहे,”असे प्रशिक्षक शरद तरटे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

3 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

9 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

9 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

9 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

10 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago