शिरूर तालुका

कळवंतवाडीच्या समृद्धी चव्हाण हिचं नेमबाजीतील सुवर्ण यश

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड; शिरूर तालुक्याचा अभिमान

शिरूर (अरुणकुमार मोटे): नेवासा फाटा, अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या शालेय विभागीय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ मध्ये शिरूर तालुक्यातील कळवंतवाडी गावच्या समृद्धी अजय चव्हाण हिने थक्क करणारी कामगिरी करत १० मीटर पिप साईट एअर रायफल प्रकारात ४०० पैकी तब्बल ३९८ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. या चमकदार कामगिरीच्या जोरावर तिने नागपूर येथे २६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ साठी पात्रता मिळवली असून, शिरूर तालुक्याचा लौकिक वाढवला आहे.

अतिशय कमी कालावधीत उल्लेखनीय यश मिळवत समृद्धीने नेमबाजी क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. केवळ दीड वर्षांच्या अथक परिश्रमानंतर तिने भारतीय संघ निवड चाचणी स्पर्धेपर्यंत मजल मारली, ही तिच्या जिद्दीची आणि निष्ठेची साक्ष देणारी बाब आहे.

याआधी तिने उत्तराखंड, भोपाळ, दिल्ली, केरळ आणि पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चाचणी, राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून, तिची कामगिरी सातत्याने उजवी ठरली आहे.

समृद्धीला शिरूर येथील युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक शरद तरटे यांचे तज्ज्ञ मार्गदर्शन लाभत आहे. तसेच तिच्या आई-वडिलांचा आणि कुटुंबीयांचा प्रोत्साहनपर पाठिंबा हे तिच्या यशामागील प्रमुख बळ मानले जाते.

समृद्धीच्या या यशाबद्दल शिरूर तालुका तसेच कळवंतवाडी परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

“समृद्धीने मेहनतीच्या जोरावर नेमबाजी क्षेत्रात अल्पावधीत उत्तुंग झेप घेतली आहे. तिच्याकडून भविष्यात भारतीय संघात प्रतिनिधित्वाची अपेक्षा आहे,”असे प्रशिक्षक शरद तरटे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

9 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

9 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

9 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

9 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

9 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

10 तास ago