शिरूर तालुका

सणसवाडीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ध्वजारोहणाचा मान

शिक्रापूर: ध्वजारोहण करण्यासाठी अनेकांची रस्सीखेच चालल्याचे चित्र नेहमी दिसत असताना काही ठिकाणी ध्वजारोहणाचा मान मिळवण्यासाठी मोठमोठी पदे खेचून आणली जात असताना सणसवाडी येथील ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलेल्या ध्वजारोहणाचा मान चक्क ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथे १५ ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाची ध्वजारोहण करत सुरवात करण्यात आली. यावेळी सरपंच संगिता हरगुडे, उपसरपंच सागर दरेकर, ग्रामपंचायत सदस्या रुपाली दरेकर, राजेंद्र दरेकर, कीर्ती दरेकर, नवनाथ हरगुडे, दगडू दरेकर, ग्रामविकास अधिकारी बाळनाथ पवणे, बबन हरगुडे, ग्रामपंचायत कर्मचारी विष्णू गोसावी, संभाजी दरेकर, गौतम चव्हाण, रेखा चौधरी यांसह आदी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी करण्यात येणारे ध्वजारोहण आपण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करत ध्वजारोहण करावे, असा सल्ला उपसरपंच सागर दरेकर यांनी उपस्थितांना दिला अन सर्वांनी होकार देत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी देकील आनंदित झाले असून आम्हाला ध्वजारोहणाचा मान मिळाल्याचा मोठा आनंद होत असल्याचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

10 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

13 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

13 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

14 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

14 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

15 तास ago