शिरूर तालुका

सणसवाडीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ध्वजारोहणाचा मान

शिक्रापूर: ध्वजारोहण करण्यासाठी अनेकांची रस्सीखेच चालल्याचे चित्र नेहमी दिसत असताना काही ठिकाणी ध्वजारोहणाचा मान मिळवण्यासाठी मोठमोठी पदे खेचून आणली जात असताना सणसवाडी येथील ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलेल्या ध्वजारोहणाचा मान चक्क ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथे १५ ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाची ध्वजारोहण करत सुरवात करण्यात आली. यावेळी सरपंच संगिता हरगुडे, उपसरपंच सागर दरेकर, ग्रामपंचायत सदस्या रुपाली दरेकर, राजेंद्र दरेकर, कीर्ती दरेकर, नवनाथ हरगुडे, दगडू दरेकर, ग्रामविकास अधिकारी बाळनाथ पवणे, बबन हरगुडे, ग्रामपंचायत कर्मचारी विष्णू गोसावी, संभाजी दरेकर, गौतम चव्हाण, रेखा चौधरी यांसह आदी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी करण्यात येणारे ध्वजारोहण आपण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करत ध्वजारोहण करावे, असा सल्ला उपसरपंच सागर दरेकर यांनी उपस्थितांना दिला अन सर्वांनी होकार देत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी देकील आनंदित झाले असून आम्हाला ध्वजारोहणाचा मान मिळाल्याचा मोठा आनंद होत असल्याचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

1 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

1 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

1 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

2 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

3 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

3 तास ago