शिरूर तालुका

स्व. मा.आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंगणवाडीच्या लहान मुलांना साहित्य वाटप

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर हवेलीचे स्वर्गीय माजी आमदार बाबुराव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शिरूर नगरपरिषदेच्या शाळांमधील अंगणवाडीच्या लहान विद्यार्थ्यांना बसण्यासाठी श्रीराम सेनेच्या वतीने खुर्च्या, चटई, टेबल आदी साहित्य वाटप करण्यात आले आहे.

शिरूर शहरातील मुंबई बाजार या अंगणवाडीच्या शाळेला ५० खुर्च्या, ४ मोठ्या चटई आणि टेबल अशा स्वरूपाच्या वस्तू श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष, मा.शहर प्रमुख सुनील जाधव यांच्या संकल्पनेतून वाटप करण्यात आल्या. यापुढेही या अंगणवाडीला अशीच भरीव मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लहान मुलांना मोठया कष्टाने घडवण्याचे काम या अंगणवाडीमधील शिक्षक करत आहे. अंगणवाडी मध्ये मुलांना रंगाची ओळख, गाणे, कविता, खेळ अभ्यास शिकवण्याचे काम या अंगणवाडीमधील 4 शिक्षका करत आहे. पाचर्णे साहेबांच्या आठवणी सदैव जाग्या राहण्यासाठी या लहान विदयार्थ्यांना सर्व भौतिक सोईसुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्रीराम सेना संस्थापक अध्यक्ष सुनील दादा जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक सुनील भाऊ जठार, युवासेना शहर अधिकारी स्वप्निल अण्णा रेड्डी, मा.सरपंच जगदीश पाचर्णे, श्रीराम सेना सदस्य महेंद्र येवले, सिद्धांत चव्हाण, आकाश चौरे, सुरेश आरेवार, निलेश धावडे आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

6 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

6 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

6 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

6 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

8 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

8 तास ago