शिरूर तालुका

शिरुरमधील रुबी हॉल संलग्न हॉस्पिटलवर गंभीर आरोप आयुष्यमान कार्ड असुनही गोरगरीबांची आर्थिक लुट…?

शिरुर (तेजस फडके): शासकीय आयुष्यमान भारत योजना तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असतानाही अपघातग्रस्त गोरगरीब रुग्णांकडुन बळजबरीने हजारो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार शिरुर येथे उघडकीस आला आहे. अपघातग्रस्तांना मोफत उपचार नाकारत हजारो रुपये उकळल्याचा प्रकार उघड झाला आहे.

या प्रकरणात शिरुर येथील रुबी हॉल क्लिनिक (ग्रँट मेडिकल फाउंडेशन संलग्न) आणि मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले असुन सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे तसेच पत्रकार अमोल बोरगे यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

अपघातानंतर मोफत उपचाराऐवजी थेट बिल…

श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील सयाजी तबाजी आडगळे तसेच त्यांच्या पत्नी सारीका सयाजी आडगळे यांना शुक्रवार, दि १९ डिसेंबर २०२५ रोजी ट्रॅक्टरने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सयाजी आडगळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने १९ टाके घालावे लागले. जखमींना शिरुर येथील रुबी हॉल क्लिनिक (ग्रँट मेडिकल फाउंडेशन संलग्न) आणि मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, आयुष्यमान कार्ड असुनही “कार्ड चालत नाही”, “या कार्डवर उपचार होत नाहीत” असे सांगत मोफत उपचार नाकारण्यात आले. याउलट दोन्ही रुग्णांचे मिळुन सुमारे ७० हजार रुपयांचे बिल आकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, काही रक्कम रोख स्वरुपात वसुल केल्याचाही गंभीर आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

अनुसूचित जातीतील मोलमजुर कुटुंबाची पिळवणूक

सदर अपघातग्रस्त कुटुंब हे मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणारे व अनुसूचित जातीतील आहे. शासनाच्या अपघात व आरोग्य योजनांचा लाभ मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असताना, रुग्णालयाने शासकीय धोरणांचे उघड उल्लंघन केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

औषधांच्या दरात लूट; बिलात तफावत

सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारल्यानंतर बिलामध्ये मोठी तफावत असल्याचे समोर आले. रुग्णालयातील मेडिकलमधील औषधांचे दर बाहेरील मेडिकलपेक्षा अनेक पटींनी जास्त असल्याचेही स्पष्ट झाले.

प्रशासकाकडुन अरेरावी, पोलिसांना पाचारण

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुग्णालयाचे मुख्य प्रशासक मायकेल पॉल यांनी सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे तसेच पत्रकार अमोल बोरगे यांच्याशी अरेरावीची भाषा व धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनालाही पाचारण करण्यात आले. मात्र, औषधांचे वाढीव दर व रुग्ण शासकीय योजनेस पात्र असल्याचे ठोस पुरावे समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला कर्मचारी व रुग्णांसमोर माफी मागावी लागली, अशी खात्रीलायक सुत्रांनी माहिती दिली आहे.

५० हजार रुपये वाचले; आंदोलनाचा इशारा

या संघर्षामुळे अडगळे कुटुंबाचे तब्बल ५० हजार रुपये वाचले असून, संबंधित कुटुंबाने भारतीय बहुजन पालक संघाचे आभार मानले आहेत.

दरम्यान,

दोषी रुग्णालयावर कठोर कारवाई

रुग्णांकडून आकारलेली रक्कम परत मिळवून देणेगरज भासल्यास रुग्णालयाची शासकीय मान्यता रद्द करणे

रुग्णालयाच्या दर्शनी भागात मोफत उपचारांची यादी व दर मराठीत लावणे

अशा ठाम मागण्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आल्या आहेत.

गरीबांची लूट सहन करणार नाही – बहुजन पालक संघ

सरकारी जागेवर चालणाऱ्या कोणत्याही रुग्णालयाने गरीब, गरजू व अपघातग्रस्त रुग्णांची आर्थिक लूट केल्यास कठोर आंदोलन व कायदेशीर लढा उभारला जाईल, असा इशारा भारतीय बहुजन पालक संघाने दिला आहे. या घटनेमुळे शासकीय आरोग्य योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती ढिसाळ आहे, यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शासन या प्रकरणात काय कारवाई करते याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

4 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

4 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

4 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

4 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

6 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

6 तास ago