शिरूर तालुका

शिरूर तालुक्याच्या सरहद्दीवर बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू…

शिरूर: जुन्नर आणि शिरूर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या पारगाव तर्फे आळे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

रोहित काफरे (वय 8) असे मृत मुलाचे नाव आहे. रोहित याचे आई-वडील शेतात कांदा लागवडीचे काम करत होते. याचवेळी रोहित शेतालगत खेळत असताना ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला आणि रोहितला फरफटत नेऊन ठार केले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत रोहितचा मृत्यू झाला होता. या घटनेने काफरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या तीन महिन्यांतील बिबट्याच्या हल्ल्यांमधील ही चौथी मृत्यूची घटना आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावारण पसरले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर वनविभाग आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त, पिंजरे लावणे, गस्त वाढवणे आणि परिसर सुरक्षित करण्याची जोरदार मागणी केली आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे जगणे असुरक्षित झाले असून, प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

Video: वाघाळे गावात बिबट्याने पोल्ट्री फार्ममधून पाळीव कुत्रा नेला उचलून…

करडे गावात मध्यरात्री घायतडक वस्तीवर घरात घुसून बिबट्याचा श्वानावर हल्ला…

शिरूर तालुक्यात बिबट्या केला जेरबंद; स्थानिकांना दिलासा…

Video: रांजणगाव MIDC परिसरात शिरला बिबट्या…

शिरूर तालुक्यात बिबट्यांसाठी कृत्रिम जंगल केले जाणार विकसीत; कोठे पाहा…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

3 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

3 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

3 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

3 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

3 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

5 तास ago