शिरूर पोलिसांकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न…

आंदोलक कैलास कर्डिले यांना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यास न्यायालयाचा नकार

शिरुर (अरुणकुमार मोटे): सरदवाडी (ता. शिरूर)  हद्दीतील नवीन एमआयडीसी टप्पा क्रं. ३ मधील आय. एफ. बी कंपनी प्रकल्पबाधित स्थानिकांना प्राधान्याने नोकरी व कामे देत नसल्याने (दि. १३) जुलै पासून कैलास वसंत कर्डिले हे ग्रामस्थांसह उपोषण करून आंदोलन करीत आहेत. त्यांना (दि. १७) जुलै रोजी पहाटे २.४५ वा. चे सुमारास पोलीसांनी जबरदस्ती आंदोलन स्थळावरून अटक केली.

सीआरपीसी कलम १५१ प्रमाणे त्यांचेविरूध्द शिरूर पोलीसांनी कारवाई करून शिरूर येथील न्यायालयामध्ये हजर करून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीची मागणी केलेली होती. सदर प्रकरणामध्ये आंदोलकांचे न्याय्य हक्कांवर गदा येत असल्याचा तसेच पोलीसांची कारवाई केवळ आंदोलन दडपण्यासाठी केलेली असल्याचा युक्तिवाद आंदोलन कर्त्याच्यावकीलांनी केला. तद्नंतर न्यायालयाने पोलीसांची मागणी फेटाळून आंदोलनकर्ते कैलास कर्डिले यांना मुक्त करण्याचे आदेश पारीत केला. सदर प्रकरणी आंदोलनकर्त्यातर्फे ऍड. उदय सरोदे, ऍड. अभिषेक बाफणा, ऍड. मगर, ऍड स्वप्नील कापरे, ऍड. मांजरे निखिल, ऍड. झुंजार, ऋतुजा खोले यांनी बाजू मांडली.

आंदोलनकर्ते कैलास कर्डिले यांच्या उपोषणास पाठींबा देऊन जनावरांसह गाई, गुरांसह आंदोलनाला बसणार असल्याचे सरदवाडी ग्रामस्थांनी सांगितले आहे. उपोषण थांबविण्याकरिता धाक दडपशाही करून कपंनीच्या फायद्यासाठी प्रयत्न चालू शिरुर पोलीसांनी जबरदस्ती उपोषण थांबविण्याचे इराद्याने उपोषण कर्त्याची तब्येत व्यवस्थित असताना कैलास कर्डिले यांना ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल केले होते.

उपोषणास सरदवाडी ग्रामस्थांसह महीलांचा पाठींबा असून द दि.१७जून पासून बेमुदत मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याचे नागरीकांनी सांगितले आहे.

२००८च्या शासण निर्णयाप्रमाणे स्थानिकांना कंपण्यामध्ये ८० % नोकऱ्या मिळणे अपेक्षित असताना कंपन्यांची आडमुठी भुमिका पहायला मिळत असून शासण नियम पायदळी तुडवल्याने महाराष्ट्रातील तरुणांवर अन्याय होत आहे. प्रकल्पबाधीतांनाही यामध्ये डावलण्यात येत आहे.कंपन्या व स्थानिकांमध्ये समन्वय राहणे आवश्यक आहे.

निलेश वाळुंज – सामाजिक कार्यकर्ता

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

11 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

12 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

12 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

12 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

17 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

17 तास ago