abdul-sattar-nitin-thorat
शिरूरः राष्ट्रीय किसान मजूर महासंघाच्या शिष्टमंडळांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून निवेदन दिले आहे, अशी माहिती राज्याचे उपाध्यक्ष नितीन थोरात यांनी दिली.
सदर निवेदनात म्हटले आहे की, ‘शेतकऱ्यांना कृषीपंपाला विज पुरवठा रात्रीच्या वेळी करण्यात येत असल्याने पुरेशी झोप न मिळू शकल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना वेळेत आरोग्य सेवा न मिळू शकल्याने त्या शेतकऱ्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला तर तो त्याच्या कुटुंबाकरीता अपघातच आहे. या घटनेला अपघात समजून शेतकऱ्याच्या वारसांना शेतकरी अपघात विम्याचा लाभ देण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.’
सदर राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाच्या शिष्ट मंडळामध्ये शेतकरी नेते राज्याचे उपाध्यक्ष नितीन थोरात, अध्यक्ष शंकर दरेकर, भाऊसाहेब माशेरे, आबासाहेब जाधव, अक्षय माशेरे, किरण दरेकर, विनायक जेउघाले, युवराज सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…
जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…
छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…
मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…
पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…
पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…