abdul-sattar-nitin-thorat
शिरूरः राष्ट्रीय किसान मजूर महासंघाच्या शिष्टमंडळांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून निवेदन दिले आहे, अशी माहिती राज्याचे उपाध्यक्ष नितीन थोरात यांनी दिली.
सदर निवेदनात म्हटले आहे की, ‘शेतकऱ्यांना कृषीपंपाला विज पुरवठा रात्रीच्या वेळी करण्यात येत असल्याने पुरेशी झोप न मिळू शकल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना वेळेत आरोग्य सेवा न मिळू शकल्याने त्या शेतकऱ्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला तर तो त्याच्या कुटुंबाकरीता अपघातच आहे. या घटनेला अपघात समजून शेतकऱ्याच्या वारसांना शेतकरी अपघात विम्याचा लाभ देण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.’
सदर राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाच्या शिष्ट मंडळामध्ये शेतकरी नेते राज्याचे उपाध्यक्ष नितीन थोरात, अध्यक्ष शंकर दरेकर, भाऊसाहेब माशेरे, आबासाहेब जाधव, अक्षय माशेरे, किरण दरेकर, विनायक जेउघाले, युवराज सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…