तळेगाव ढमढेरे: शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे जीर्ण झालेला फडणवीस वाडा मोडकळीस आला असुन त्या वाड्याभोवती लोकवस्ती असल्याने वर्दळ असते. त्याचबरोबर मुख्य पेठेत जुनी इमारत झाली असल्याने नागरिकांच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने एखादी अनुचित घटना घडली. तर या घटनेला जबाबदार कोण…? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे येथील ग्रामपंचायत सदस्य अँड सुरेश भुजबळ यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत पत्रव्यवहार केला आहे.
तळेगाव ढमढेरे येथील जुन्या काळातील फडणवीस वाड्याची इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे येथुन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका असल्यामुळे फडणवीस वाड्या सह इतर संबंधित वाडा मालकांना सुचना करण्यात यावी असेही त्या पत्रात म्हटले आहे. मुख्य बाजार पेठेच्या रस्त्यालगत मोडकळीस आलेल्या या इमारतीचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा, विद्यालय, महाविद्यालय आहेत. समोरच पोस्ट ऑफिस आणि राम मंदिर आहे. मुख्य पेठेतून ये-जा करताना वृद्ध नागरीक तसेच विद्यार्थ्यांना व नागरीक यांच्या जिवास मोडकळीस आलेल्या या वाड्यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गावातील इतर अनेक वाडे जीर्ण झालेले आहेत. त्याची पाहणी करून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक वर्षे तिरंगा ध्वजाला विरोध केला, स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग नव्हता…
मुंबई : आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या वरळी येथील आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाला…
मुंबई : स्वातंत्र्यलढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. याच…
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातही सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष कायम आहे. मंगळवारी…
सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार…
मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागणीची दखल; अविनाश रणखांब यांची नव्या एमडीपदी नियुक्ती मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक…