शिरूर तालुका

रांजणगाव गणपती येथील बबनराव लवांडे यांचे निधन

शिरूर: रांजणगाव गणपती येथील ह.भ.प. बबनराव कान्हू लवांडे यांचे बुधवारी (ता. ३१) सायंकाळी साडेसातच्या सुमारास निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. आज (गुरुवार) सकाळी त्यांच्यावर दत्तनगर, लवांडेवस्ती येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले.

ह.भ.प. बबनराव कान्हू लवांडे यांनी अखंड 35 वर्षे विठ्ठल वारी केली. शिवाय, ते विणेकरी होते. रांजणगावचे नामांकित शेतकरी, धार्मिक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. लवांडे हे आपल्या शांत स्वभाव आणि प्रामाणिक सेवाभावासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी शेतकरी कल्याण, धार्मिक उपक्रम आणि समाजाच्या विविध क्षेत्रात सक्रिय योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे स्थानिक समाजावर सकारात्मक प्रभाव पडला होता.

रांजणगाव गणपती येथील लवांडेवस्ती (देवाचीवाडी) परिसरात ह.भ.प. बबनराव कान्हू लवांडे यांचे वास्तव्य होते. मोठ्या कष्टातून त्यांनी शेती करताना मुलगा अंकुश लवांडे यांना उच्च शिक्षण देऊन डॉक्टर केले होते. धार्मिक क्षेत्रासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. विणेकरी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने रांजणगाव गणपती परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, चार भाऊ, एक बहीण, पुतणे उजोजक गणेश लवांडे, माऊली लवांडे, देविदास लवांडे, संदीप लवांडे, रवींद्र लवांडे, रोहिदास लवांडे, नातू उद्योजक अविनाश कुटे, पुतणे असा मोठा परिवार आहे. रांजणगाव गणपती देवस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. अंकुश लवांडे हे त्यांचे पुत्र होत.

रांजणगाव गणपती येथील सुदामराव कुटे यांचं निधन

रांजणगाव गणपती येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जाधव यांचे निधन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

धार्मिक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप अयोग्य; हजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करा; अस्लम शेख

मुंबई: नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करावी आणि…

3 तास ago

दररोज एक लहान आल्याचा तुकडा खाल्ल्याचे फायदे

पचन सुधारते आलं पाचक रस वाढवतं, गॅस व अपचन कमी करतं दाहशामक (Anti-inflammatory) सांधेदुखी, स्नायू…

3 तास ago

आठवड्याभराची अपुरी झोप वीकेंडला घेतल्याने हृदय विकाराचा धोका कमी होऊ शकतो

झोप ही प्रत्येकालाच आवडते आणि प्रत्येकाची झोपण्याची शैली वेगवेगळी असते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात चांगली झोप…

3 तास ago

दीर्घायुष्यासाठी दीर्घ श्‍वसन फायदे तोटे

आपण अस्वस्थ होतो तेव्हा नेहमी शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय जेव्हा जखम होते तेव्हा…

3 तास ago

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत एल्गार थांबणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आयोजित 'एल्गार अन्नदात्याचा' आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश…

3 तास ago

संगमनेर अॅसिड हल्ला प्रकरणात आरोपीला तातडीने अटक करून पीडितेला न्याय द्या; आमदार सत्यजीत तांबे

मुंबई: संगमनेर येथे १२ वर्षीय मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ला प्रकरणात ९० दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही आरोपीचा…

3 तास ago