शिरूर तालुका

रांजणगाव गणपती येथील बबनराव लवांडे यांचे निधन

शिरूर: रांजणगाव गणपती येथील ह.भ.प. बबनराव कान्हू लवांडे यांचे बुधवारी (ता. ३१) सायंकाळी साडेसातच्या सुमारास निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. आज (गुरुवार) सकाळी त्यांच्यावर दत्तनगर, लवांडेवस्ती येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले.

ह.भ.प. बबनराव कान्हू लवांडे यांनी अखंड 35 वर्षे विठ्ठल वारी केली. शिवाय, ते विणेकरी होते. रांजणगावचे नामांकित शेतकरी, धार्मिक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. लवांडे हे आपल्या शांत स्वभाव आणि प्रामाणिक सेवाभावासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी शेतकरी कल्याण, धार्मिक उपक्रम आणि समाजाच्या विविध क्षेत्रात सक्रिय योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे स्थानिक समाजावर सकारात्मक प्रभाव पडला होता.

रांजणगाव गणपती येथील लवांडेवस्ती (देवाचीवाडी) परिसरात ह.भ.प. बबनराव कान्हू लवांडे यांचे वास्तव्य होते. मोठ्या कष्टातून त्यांनी शेती करताना मुलगा अंकुश लवांडे यांना उच्च शिक्षण देऊन डॉक्टर केले होते. धार्मिक क्षेत्रासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. विणेकरी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने रांजणगाव गणपती परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, चार भाऊ, एक बहीण, पुतणे उजोजक गणेश लवांडे, माऊली लवांडे, देविदास लवांडे, संदीप लवांडे, रवींद्र लवांडे, रोहिदास लवांडे, नातू उद्योजक अविनाश कुटे, पुतणे असा मोठा परिवार आहे. रांजणगाव गणपती देवस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. अंकुश लवांडे हे त्यांचे पुत्र होत.

रांजणगाव गणपती येथील सुदामराव कुटे यांचं निधन

रांजणगाव गणपती येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जाधव यांचे निधन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पावसाळ्यातील आहार कसा असावा

आयुर्वेदानुसार विसर्ग काळात म्हणजे सुर्याचे दक्षिणायन सुरु झाल्यावर म्हणजेच पावसाळ्यात शरीरात वात दोष शरीरात बळावतो…

1 तास ago

किचनमध्ये काम करताना त्वचेला चटका लागल्यावर टूथपेस्ट लावता

अनेकदा किचनमध्ये काम करत असताना, स्वयंपाक करत असताना गरम भांड्यांना हात लावल्यावर किंवा चपात्या भाजताना…

1 तास ago

उत्तर भारतीय समाजाचा काँग्रेसला पाठिंबा; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

मुंबई: उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…

15 तास ago

बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन खंबीर; विकासाच्या प्रवासात बीडकरांनी साथ द्यावी; सुनेत्रा पवार

बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा…

15 तास ago

संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

मुंबई : स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही सहभाग नसलेल्या शक्ती आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. या…

15 तास ago

झोपेतून उठत रात्री पुन्हा पुन्हा पाणी प्यावं लागतं? सावध व्हा, ‘या’ आजारांचा असू शकतो इशारा

अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या…

15 तास ago