शिरूर: रांजणगाव गणपती येथील ह.भ.प. बबनराव कान्हू लवांडे यांचे बुधवारी (ता. ३१) सायंकाळी साडेसातच्या सुमारास निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. आज (गुरुवार) सकाळी त्यांच्यावर दत्तनगर, लवांडेवस्ती येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले.
ह.भ.प. बबनराव कान्हू लवांडे यांनी अखंड 35 वर्षे विठ्ठल वारी केली. शिवाय, ते विणेकरी होते. रांजणगावचे नामांकित शेतकरी, धार्मिक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. लवांडे हे आपल्या शांत स्वभाव आणि प्रामाणिक सेवाभावासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी शेतकरी कल्याण, धार्मिक उपक्रम आणि समाजाच्या विविध क्षेत्रात सक्रिय योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे स्थानिक समाजावर सकारात्मक प्रभाव पडला होता.
रांजणगाव गणपती येथील लवांडेवस्ती (देवाचीवाडी) परिसरात ह.भ.प. बबनराव कान्हू लवांडे यांचे वास्तव्य होते. मोठ्या कष्टातून त्यांनी शेती करताना मुलगा अंकुश लवांडे यांना उच्च शिक्षण देऊन डॉक्टर केले होते. धार्मिक क्षेत्रासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. विणेकरी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने रांजणगाव गणपती परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, चार भाऊ, एक बहीण, पुतणे उजोजक गणेश लवांडे, माऊली लवांडे, देविदास लवांडे, संदीप लवांडे, रवींद्र लवांडे, रोहिदास लवांडे, नातू उद्योजक अविनाश कुटे, पुतणे असा मोठा परिवार आहे. रांजणगाव गणपती देवस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. अंकुश लवांडे हे त्यांचे पुत्र होत.
रांजणगाव गणपती येथील सुदामराव कुटे यांचं निधन
रांजणगाव गणपती येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जाधव यांचे निधन