gram-swarajya-ranjangaon
रांजणगाव गणपती : ग्रामीण स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे आयोजित विशेष जागरूकता व मार्गदर्शन शिबिरात न्यायव्यवस्था, दानवडणूक, कृषी व्यवस्थापन, आरोग्यदायी जीवनशैली आणि पक्षनिरपेक्ष लोकशाही अशा विविध विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शेतकरी, विद्यार्थी, ग्रामविकास अधिकारी, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
गावांना, शेतकऱ्यांना संपूर्ण स्वराज्य स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय स्वावलंबी गाव निर्माण होणार नाही. स्वावलंबी गावाचे विचारसरणीतूनच न्याय, पत्रकारिता, निवणडणूका यांची उत्तम व्यवस्था जन्माला येईल. जनतेमध्ये आज न्यायपालिका, निवणडणूका, पत्रकारिता याबाबत विश्वासहर्ता संकटात आली आहे, ही बाब चिंताजनक असल्याचे मत मान्यवरांनी चर्चासत्रात मांडले.
छत्रपतींच्या न्यायपद्धतीचा आदर्श…
न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी भाषणात सांगितले की, ‘आजही ग्रामीण भागात अनेक जुन्या प्रथा, अंधश्रद्धा आणि शोषण आधारित व्यवस्था टिकून आहेत. शेतकरी व कष्टकरी वर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायव्यवस्थेप्रमाणे संरक्षणाच्या प्रतिक्षेत आहे. गावांनी स्वावलंबन साधल्याशिवाय पूर्ण स्वराज्य शक्य नाही.’
अन्न, आरोग्य व नैसर्गिक आहाराचा आग्रह…
सचिदानंद जी (निसर्गोपचार तज्ञ) यांनी आरोग्यावरील मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, ‘जगातील कोणताही जीव शिजवलेले किंवा भाजलेले अन्न खात नाही. म्हणूनच त्यांचे आरोग्य अधिक सक्षम असते. नैसर्गिक, कच्चा व ताजा आहार हा मानवाच्या दीर्घकालीन आरोग्याचा पाया आहे. शिजवलेल्या अन्नातील जीवनशक्ती नष्ट होते. त्यामुळे शक्यतो नैसर्गिक आहार स्वीकारा.”
कृषी, अभ्यास व न्यायव्यवस्था…
लहानू कटके (केंद्रीय औद्योगिक न्यायाधिकरण, महाराष्ट्र–गोवा) यांनी विद्यार्थ्यांनी ग्रामीण न्यायव्यवस्थेचा अभ्यास कसा करावा, शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये कोणते मुद्दे महत्त्वाचे असतात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
पक्षनिरपेक्ष लोकशाहीची गरज…
अशोक पटेल (गुजरात, पक्षमुक्त भारतचे अध्यक्ष) म्हणाले, ‘आजच्या स्थितीत लोकांचा रोष पाहता, दलगत लोकशाही व पक्षीय व्यवस्था लोकांच्या विश्वासाला तडा देत आहेत. पक्ष बाजूला ठेवून नागरिकांच्या थेट सहभागातून सरकार निर्माण झाले तरच खरी लोकशाही घडू शकते.’
कार्यक्रमास मोठी उपस्थिती…
कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये दीपक गायकवाड (कृषीतज्ञ), स्वराज दुनिया आणि सत्ता तंत्रचे सपांदक शिवाजी बबन खेडकर, जितेंद्र साळुंखे, कैवल्य बोरकर, मकरंद भालेराव, साहेबराव भाकरे, योगेश भाकरे, बाळकृष्ण मते, संकेत खेडकर, गुलाब नवले, निलेश नवले, राजेंद्र ढमढेरे, सतीश ढमढेरे, पोपट जगताप, राहुल गवारे, विवेक पवार, अजिंक्य हगुडे, महेश डुके, सुनिता खेडकर, बाळासाहेब साकोरे, संभाजी नरवडे, विठ्ठल बडे, शुभम करेकर, विवेक वीर, मनीषा पाटील व सर्व ग्राम विकास अधिकारी उपस्थित होते. अक्षय शेळके, दिपक सरोजे, सागर हळगुंडे, सचिन तपकिर, ज्ञानेश्वर कोरडे, जगन्नाथ डोंबळे, जर्नादन फांढरमिसे, शिवाजी चोरमले, सुरेश लोखंडे, राजकुमार कांबळे व महाविद्यालयीन विद्यार्थि उपस्थित होते.
पत्रकारांमध्ये विवेक वळसे, नितीन पवार, तेजस फडके, पोपट पाचंगे, प्रवीण लांडे तसेच अमोल अमळनारदकर व अमन अमळनारदकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कृषी तज्ञ दीपक गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…
जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…
छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…
मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…
पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…
पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…