शिरूर: वाघाळे (ता. शिरूर) येथील ग्रामविकास अधिकारी दादासाहेब तुकाराम नाथ यांच्या पोल्ट्री फार्मवर गुरुवारी (ता. ११) पहाटे सुमारास बिबट्याने अचानक प्रवेश करून एका पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पोल्ट्री परिसरात गुरुवारी पहाटे अंदाजे तीनच्या सुमारास दोन कुत्र्यांनी जोर-जोरात भुंकणे सुरू केले. कडाक्याची थंडी असल्यामुळे फार्मवरील कामगार झोपेतून उठला नाही. याच संधीचा फायदा घेत बिबट्याने एका कुत्र्यावर झडप घालत त्याला ओढून नेले. काही वेळानंतर कामगार बाहेर आल्यानंतर त्याला केवळ एकच कुत्रा अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत भुंकताना दिसला. कामगाराने तात्काळ श्री. नाथ यांना माहिती दिली. त्यांनी पोल्ट्रीवर येऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बिबट्याने एक कुत्रा उचलून नेल्याचे स्पष्ट दिसून आले.
दरम्यान, वाघाळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतात काम करण्यासही गावकऱ्यांना धाडस होत नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. वाघाळे गावातील सूर्यकांत बढे, सुनील गावडे, गणेश गावडे, रमेश बढे यांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी करून सुरक्षिततेची उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
करडे गावात मध्यरात्री घायतडक वस्तीवर घरात घुसून बिबट्याचा श्वानावर हल्ला…
शिरूर तालुक्यात बिबट्या केला जेरबंद; स्थानिकांना दिलासा…
Video: रांजणगाव MIDC परिसरात शिरला बिबट्या…
शिरुर तालुक्यात दोन जर्सी कालवडीवर बिबट्याचा हल्ला एक ठार, दुसरी गंभीर जखमी…
Video; शिरुर; वनमंत्री तालुक्यात असतानाच बिबट्याचा दिवसाढवळ्या १० शेळ्यांवर हल्ला
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…