शिरुरमध्ये धक्कादायक प्रकार ‘मित्रा’कडुन कारचा अपहार

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका व्यक्तीने पुण्याला काम आहे असे सांगत मित्राची चारचाकी कार घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असुन मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी फिरोज हसन शेख (वय ३०, रा. गुनाट ता. शिरुर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी भगवान बाळू डोर्लेकर (मूळ रा. टिटवाळा रोड, अनाखर, ठाणे; सध्या रा. न्हावरे ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरोधात शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १२:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी भगवान डोर्लेकर याने फिर्यादी फिरोज शेख याच्याकडे “पुण्यात कामासाठी ३-४ दिवस जायचे आहे” असे सांगत त्याच्याकडे त्याची चारचाकी कार मागितली. त्यानंतर विश्वासाने फिरोज शेख यांनी आपली मारुती सुझुकी कंपनीची इरटीका (MH 14 FM 3581) ही कार आरोपीकडे दिली.

मात्र, ठरलेल्या वेळेत कार परत न करता आरोपीने ती स्वतःकडेच ठेवून अपहार केला आणि फरार झाला. काही दिवस वाट पाहूनही कार परत न मिळाल्याने अखेर फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी दि. २८ एप्रिल २०२६ रोजी शिरुर पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस हवालदार विनोद मोरे हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक : महायुतीचा दणदणीत विजय, 17 पैकी 16 जागांवर कब्जा

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महायुतीने मोठे यश संपादन करत 17…

4 तास ago

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; लवकरच दिलासादायक निर्णय होणार

मुंबई: राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून मानधन, सेवा संरक्षण आणि प्रशासकीय अधिकारांसंदर्भातील…

4 तास ago

शिंदेंचा ‘षटकार’; ठाकरे गटातील सहा खासदार शिवसेनेत दाखल

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सोमवारी मोठी घडामोड घडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा विद्यमान खासदारांनी…

16 तास ago

माहिती अधिकारावर सरकारचा घाला; बेकायदेशीर तरतुदी तात्काळ रद्द करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: माहितीचा अधिकार (RTI) हा नागरिकांना शासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी मिळालेला महत्त्वाचा…

20 तास ago

ओबीसी जनगणनेत स्वतंत्र कॉलम नसल्यास राज्यभर आंदोलन; विजय वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या देशासमोर यावी यासाठी होणाऱ्या जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करणे…

21 तास ago

देशाचे पहिले शक्तीपीठ मोदी, दुसरे शक्तीपीठ अमित शाह; एकनाथ शिंदे

इचलकरंजी: देशाच्या राजनैतिक शक्तीपीठांचा विचार केला तर पहिले शक्तीपीठ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे…

21 तास ago