मुख्य बातम्या

न्हावरे-काष्टी अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू, पती जखमी

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर आज बुधवार (दि 29) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास झालेल्या चारचाकीच्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात पती-पत्नी प्रवास करत होते, त्यापैकी पत्नी शोभा रामदास इथापे (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित चारचाकी वाहनाला कोणीतरी आडवे आल्याने चालकाचा ताबा सुटून वाहन रस्त्याच्या कडेला जोरात आदळले. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की गाडीचा समोरचा भाग पूर्णपणे चुराडा झाला. अपघातानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढले. मात्र, शोभा इथापे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी पतीला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या महामार्गावर वारंवार अपघात होत असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. वेगमर्यादा पाळली जात नसल्याने आणि काही ठिकाणी रस्त्यांची स्थिती धोकादायक असल्याने असे अपघात घडत असल्याचे स्थानिक नागरीकांचे म्हणणे आहे. याबाबत शिरुर पोलीस पुढील तपास करत आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून इथापे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शिरुरमध्ये धक्कादायक प्रकार ‘मित्रा’कडुन कारचा अपहार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक : महायुतीचा दणदणीत विजय, 17 पैकी 16 जागांवर कब्जा

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महायुतीने मोठे यश संपादन करत 17…

4 तास ago

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; लवकरच दिलासादायक निर्णय होणार

मुंबई: राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून मानधन, सेवा संरक्षण आणि प्रशासकीय अधिकारांसंदर्भातील…

4 तास ago

शिंदेंचा ‘षटकार’; ठाकरे गटातील सहा खासदार शिवसेनेत दाखल

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सोमवारी मोठी घडामोड घडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा विद्यमान खासदारांनी…

16 तास ago

माहिती अधिकारावर सरकारचा घाला; बेकायदेशीर तरतुदी तात्काळ रद्द करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: माहितीचा अधिकार (RTI) हा नागरिकांना शासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी मिळालेला महत्त्वाचा…

20 तास ago

ओबीसी जनगणनेत स्वतंत्र कॉलम नसल्यास राज्यभर आंदोलन; विजय वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या देशासमोर यावी यासाठी होणाऱ्या जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करणे…

20 तास ago

देशाचे पहिले शक्तीपीठ मोदी, दुसरे शक्तीपीठ अमित शाह; एकनाथ शिंदे

इचलकरंजी: देशाच्या राजनैतिक शक्तीपीठांचा विचार केला तर पहिले शक्तीपीठ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे…

21 तास ago