न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर आज बुधवार (दि 29) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास झालेल्या चारचाकीच्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात पती-पत्नी प्रवास करत होते, त्यापैकी पत्नी शोभा रामदास इथापे (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित चारचाकी वाहनाला कोणीतरी आडवे आल्याने चालकाचा ताबा सुटून वाहन रस्त्याच्या कडेला जोरात आदळले. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की गाडीचा समोरचा भाग पूर्णपणे चुराडा झाला. अपघातानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढले. मात्र, शोभा इथापे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी पतीला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या महामार्गावर वारंवार अपघात होत असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. वेगमर्यादा पाळली जात नसल्याने आणि काही ठिकाणी रस्त्यांची स्थिती धोकादायक असल्याने असे अपघात घडत असल्याचे स्थानिक नागरीकांचे म्हणणे आहे. याबाबत शिरुर पोलीस पुढील तपास करत आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून इथापे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुंबई: “मुंबई महाराष्ट्राची कधीच होणार नाही!” ही घोषणा त्या काळातील केवळ राजकीय भूमिका नव्हती, तर…
ठाणे: ठाणे महानगरातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ…
सातारा: महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया घालणारे यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत…
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…