मुख्य बातम्या

न्हावरे-काष्टी अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू, पती जखमी

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर आज बुधवार (दि 29) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास झालेल्या चारचाकीच्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात पती-पत्नी प्रवास करत होते, त्यापैकी पत्नी शोभा रामदास इथापे (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित चारचाकी वाहनाला कोणीतरी आडवे आल्याने चालकाचा ताबा सुटून वाहन रस्त्याच्या कडेला जोरात आदळले. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की गाडीचा समोरचा भाग पूर्णपणे चुराडा झाला. अपघातानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढले. मात्र, शोभा इथापे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी पतीला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या महामार्गावर वारंवार अपघात होत असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. वेगमर्यादा पाळली जात नसल्याने आणि काही ठिकाणी रस्त्यांची स्थिती धोकादायक असल्याने असे अपघात घडत असल्याचे स्थानिक नागरीकांचे म्हणणे आहे. याबाबत शिरुर पोलीस पुढील तपास करत आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून इथापे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शिरुरमध्ये धक्कादायक प्रकार ‘मित्रा’कडुन कारचा अपहार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…

2 तास ago

१,२३१ अनुदानित महाविद्यालयांचे कामकाज आता डिजिटल; ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…

2 तास ago

विद्यार्थ्यांच्या सूचनांचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; परीक्षा सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर थेट संवाद

मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…

2 तास ago

महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी; फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…

2 तास ago

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…

2 तास ago

रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…

4 तास ago