शिरूर (अरुणकुमार मोटे): रावडेवाडी (ता. शिरूर) येथील पराग अॅग्रो फूड्स अॅण्ड़ अलाईड प्रॉडक्ट्स प्रा.लि या साखर कारखान्याने सन २०२४-२५ च्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला कमीत कमी ३०००/- रु. प्रती टन या प्रमाणे बाजारभाव देणार असल्याची माहिती पराग साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत दळवी यांनी दिली आहे.
पराग कारखान्याचे सन २०२४-२५ चे चालू गळीत हंगामात दि. ०२/०३/२०२५ अखेर ५८००२९ मे. टन गाळप झालेले असून ६०१३७१ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने चालू असून कोजन व डिस्टिलरी प्रकल्प चालू आहे. कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्रा बाहेरील बाहेरील उस उत्पादक शेतकऱ्यांना चालू वर्षाच्या गळीत हंगामातील गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला प्रथम हप्ता प्रती मे. टन २८०० रुपये भाव देण्यात आला आहे. तसेच सन २०२४-२५ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाला कमीत कमी ३०००/- प्रती मे. टन प्रमाणे भाव देणार आहे. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस पराग साखर कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत दळवी यांनी केले आहे.
आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…
एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…
मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…
सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते सतीश पुळेकर यांची एकेकाळची गाजलेली मैत्री…
मुंबई: कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाले आहे आणि त्याचे नाव शिधापत्रिकेत (रेशन कार्ड) समाविष्ट करायचे…