३६३ पैकी ३०० नागरिक सहभागी, ४६ प्रकरणांची तडजोड
शिरूर (अरुणकुमार मोटे: शिरूर तहसिल कार्यालयात आयोजित महसूल लोक अदालतीला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद लाभला. तहसील स्तरावर नोंदणीकृत ३६३ प्रकरणांपैकी तब्बल ३०० नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली प्रकरणे मांडली. यामधून एकूण ४६ प्रकरणांचा यशस्वीपणे निपटारा करण्यात आला असून, ही सर्व प्रकरणे आपसी सहमतीने तडजोडीतून निकाली काढण्यात आली.
निपटार्यात सामील झालेल्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम १५० अंतर्गत ३३ प्रकरणे, कलम १५५ अंतर्गत १० प्रकरणे, मामलेदार कोर्ट ऍक्ट अंतर्गत कलम ५ मधील २ प्रकरणे आणि अतिक्रमण संदर्भातील कलम १३८ अंतर्गत १ प्रकरणाचा समावेश होता. प्रकरणे निकाली काढण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक संवाद साधण्यात आला आणि त्यातून तडजोडनामा करून समाधानकारक निपटारा करण्यात आला.
या लोक अदालतीस तहसीलदार बाळासाहेब मस्के,म महसुल नायब तहसीलदार प्रकाश मुसळे, तसेच महसूल विभागाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले. प्रकरणांवर कार्यवाही करताना प्रत्येक अर्जदारास न्याय मिळावा यासाठी प्रशासकीय यंत्रणा सजग राहिली होती.
लोक अदालतीमुळे अनेक जुन्या आणि प्रलंबित प्रकरणांना गती मिळाली असून, नागरिकांनी देखील या प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त केले आहे. यामुळे महसूल खात्याच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि लोकाभिमुखता अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले आहे.
प्रलंबित राहिलेल्या इतर प्रकरणांवरही टप्प्याटप्प्याने सुनावण्या घेऊन न्याय देण्याचा महसूल विभागाचा प्रयत्न असल्याचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या सहकार्याने महसूल लोक अदालतीचा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यात आला आहे.
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…
मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…