शिरूर तालुका

विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घ्यावा; गणेश फरताळे

शिक्रापूर (शेरखान शेख): विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात वाटचाल करत असताना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ या महापुरुषांच्या आदर्श घ्यावा, असे मत शिवव्याख्याते गणेश फरताळे यांनी व्यक्त केले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय युवा दिन विशेष कार्यक्रमात स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम दरम्यान बोलताना शिवव्याख्याते गणेश फरताळे बोलत होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, शिष्यवृत्ती तज्ञ एकनाथ खैरे, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरख काळे, प्रतिभा पुंडे, दीपक खैरे, तुषार सिनलकर, पोपट दरंदले, संदीप गिते, विद्या सपकाळ, सचिन बेंडभर, संदीप वाबळे, मल्हारी वाबळे, सुरेखा वाबळे, सतीश कोठावळे, प्रकाश वाबळे, भगवान वाबळे, केशव वाबळे, अंकुश वाबळे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी शिवव्याख्याते गणेश फरताळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राजमाता जिजाऊं विषयी माहिती सांगत शिवरायांना घडवण्यात जिजाऊंची भूमिका स्पष्ट करत राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंदांविषयी त्यांनी आपले विचार स्पष्ट करत त्यांच्या जीवनातील काही प्रेरणादायी गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या असून शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांच्या आदर्श घेत आपल्या भावी आयुष्याची वाटचाल करावी आणि जीवनात यशस्वी व्हावे, असा मोलाचा सल्ला देखील शिवव्याख्याते गणेश फरताळे यांनी विद्यार्थ्यांना दिला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट दरंदले यांनी केले तर किरण अरगडे यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

3 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

3 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

4 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

4 तास ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

14 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

18 तास ago