शिरूर तालुका

बिबट्याचा बंदोबस्त करा: शेखर पाचूंदकर यांची मागणी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): शिरुर तालुक्यातील अनेक भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यात ऊस तोडणी झाल्यामुळे बिबट्याला आश्रयासाठी जागा उरली नसल्याने बिबट्याने त्याचा मोर्चा लोकवस्तीकडे वळविला आहे. शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, वासरांवर सातत्याने बिबट्या हल्ला करत आहे. आता त्याचा वावर लोकवस्तीकडे वाढल्याने माणसांवर देखील हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचूंदकर यांनी शिरुर तालुका वन अधिकारी मनोहर म्हसेकर यांची भेट घेऊन मागणी केली आहे.

unique international school

खंडाळे, सोनेसांगवी, रांजणगाव गणपती, पिंपरी दुमाला, वाघाळे या भागात सातत्याने पाळीव प्राण्यांवर बिबट्या हल्ला करतो त्यामुळे स्थानिक नागरिक भयभीत अवस्थेत आहेत. रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना पिकांना पाणी द्यायला घराबाहेर पडायला भीती वाटते. कामगारांना रात्री उशीरा घरी जाताना रस्त्यावर बिबट्याचे दर्शन होते.

अनेकदा पिंजरे लावूनही बिबट्या पिंजऱ्याला हुलकावणी देत आहे. त्यामुळे या बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा त्याचबरोबर गावागावांतील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना बिबट्यापासून वाचण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी वनाधिकारी मनोहर म्हसेकर यांच्याकडे शेखर पाचूंदकर यांनी केली.

दरम्यान म्हसेकर यांनी अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत यावर सातत्याने काम सुरु आहे. तरी देखील गावागावांत आपण शेतकरी आणि नागरिकांना लवकरच प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

47 मिनिटे ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

2 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

2 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

2 तास ago

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…

2 तास ago

सामाजिक न्याय की राजकीय गणित? जाहिरातीतील एका चौकटीने पेटवला नवा वाद!

मुंबई: राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणांचा पाऊस पडतो; पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्या…

2 तास ago