शिरूर तालुका

टाटा चौक ते ढोकसांगवी कडे जाणाऱ्या रस्त्यावर कायमच वाहतुक कोंडी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मधील टाटा स्टील चौक ते ढोकसांगवी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाटा स्टील, फियाट, वाडको पॅकेजिंग, ग्रुपो अँटोलीन, बजाज, एम टेक, पॉली प्लास्टिक, नॅनको एक्झिम, अथर्व पॉलिमर, थ्री ए,जामील स्टील या कंपन्या असुन या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा माल वाहतुक करणारी वाहने टाटा स्टील चौक ते ढोकसांगवी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा उभी केलेली असतात. त्यामुळे रोज सकाळी या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असुन या सर्व कंपन्यांवर वाहतुकीस अडथळा होत असल्याने गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र या संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय पाचुंदकर (पाटील), शिरुर तालुकाध्यक्ष काशिनाथ पाचंगे, उपाध्यक्ष रणजित पाचंगे, सचिव दशरथ पंचरास यांनी केली असुन याबाबत गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासनाला अनेकवेळा पत्रव्यवहार करुनही परिस्थिती “जैसे थे” असल्याने पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati

बजाज कंपनी ते जामील स्टील या कंपनीकडे जाण्यासाठी एकाच बाजुने (वन वे) रस्ता असुन या सुमारे अर्धा किमी अंतराच्या रस्त्यावर नो पार्किंग झोन असतानाही या ठिकाणी नो पार्किंग मध्ये अवजड वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असुन या ठिकाणी गंभीर अपघात होण्याचा धोका आहे. तसेच टाटा स्टील, फियाट, वाडको पॅकेजिंग, ग्रुपो अँटोलीन, बजाज या कंपन्यांच्या बाहेर रोजच दुतर्फा वाहनांच्या रांगा असल्याने स्थानिक नागरीकांना सकाळी १० वाजेपर्यंत रांजणगाव किंवा पुणे याठिकाणी जायचं असेल तर सुमारे ७ ते ८ किमी लांबच्या मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे त्यांना विनाकारण मनस्ताप होत असुन रस्त्याच्या दुतर्फा उभी असणारी आणि वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी पुढे येत आहे.

रांजणगाव MIDC मध्ये सुमारे ४०० च्या आसपास कंपन्या असुन या कंपनीत बाहेरुन अनेक माल वाहतुक वाहने येत असतात. औद्योगिक वसाहतीत बाहेरुन येणाऱ्या वाहनांना पार्किंगसाठी वाहनतळ हे फक्त “कागदावरच” असुन अनेक कंपनीच्या बाहेर कायमच दुतर्फा अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असुन नियमाप्रमाणे कंपनी बांधताना प्रत्येक कंपनीच्या आत वाहनांच्या पार्किंगची सोय असणे गरजेचे आहे. त्यामुळे कंपनीच्या गेटच्या बाहेर उभ्या राहणाऱ्या गाड्यांची सोय कंपनीच्या आत करावी अन्यथा वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने सदर कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय पाचुंदकर (पाटील) आणि शिरुर तालुकाध्यक्ष काशिनाथ पाचंगे यांनी केली आहे.

रांजणगाव पोलिसांनी केली तब्बल ५१ लाखांची दंड वसुली…
रांजणगाव MIDC मधील अंतर्गत रस्त्यावर रहदारीस अडथळा करणाऱ्या वाहनांवर रांजणगाव पोलिसांनी जानेवारी ते जुलै या दरम्यान कारवाई करत तब्बल ५१ लाख ५ हजार ६५० रुपयांचा दंड वसुल केला असल्याची माहीती रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी सांगितले. रांजणगाव MIDC मधील अनेक कंपन्याच्या अंतर्गत रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडचण निर्माण होत असल्याने या वाहनांवर गेल्या ७ महिन्यात मोठ्या प्रमाणात कारवाई करत दंड वसुल करण्यात आल्याचे मांडगे यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

7 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

7 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

9 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago