शिरूर तालुका

केंदूर परिसरातील वेळनदीला पुर आल्याने पुल पाण्याखाली

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील वेळ नदीला अनेक वर्षानंतर पूर आलेला असल्याने येथील पूल पाण्याखाली गेला त्यामुळे परिसरातील वा वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांचा संपर्क तुटला असल्याने येथील पुलाची उंची वाढवण्याची मागणी परिसरातील नागरिक व ग्रामस्थ करत आहेत.

केंदूर (ता. शिरुर) येथील वेळ नदीला पुर आल्याने केंदूर- धामारी व पऱ्हाडवाडी- मुखई या नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने नागरिकांचा संपर्क तुटलेला आहे. वेळनदी वरील थिटेवाडी बंधारा 100 टक्के भरलेला असल्याने सातगाव पठार परिसरात तसेच नदी भागात मुसळधार पाउस झाल्यास नदीला मोठा पुर येत आहे.

त्यामुळे या भागातील लहान पुल पाण्याखाली जात आहेत. या परिसरातील पुल पाण्याखाली गेल्याने या भागातील महादेवाडी, तवलीबेंद, माळीमळा, पऱ्हाडवाडी या वस्त्यांना प्रवासासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी गेली 2 ते 3 वर्षापासून वेळ नदीला इतक्या मोठ्या प्रमाणात पूर कधीच आलेला नव्हता.

मात्र बंधारा भरल्यामुळे मोठा पूर पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतीला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे या परिसरातील पुलांची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिरुर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड व उद्योजक प्रमोद पऱ्हाड यांनी सांगीतले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…

2 तास ago

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

15 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

21 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

21 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

21 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

22 तास ago