शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील वेळ नदीला अनेक वर्षानंतर पूर आलेला असल्याने येथील पूल पाण्याखाली गेला त्यामुळे परिसरातील वा वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांचा संपर्क तुटला असल्याने येथील पुलाची उंची वाढवण्याची मागणी परिसरातील नागरिक व ग्रामस्थ करत आहेत.
केंदूर (ता. शिरुर) येथील वेळ नदीला पुर आल्याने केंदूर- धामारी व पऱ्हाडवाडी- मुखई या नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने नागरिकांचा संपर्क तुटलेला आहे. वेळनदी वरील थिटेवाडी बंधारा 100 टक्के भरलेला असल्याने सातगाव पठार परिसरात तसेच नदी भागात मुसळधार पाउस झाल्यास नदीला मोठा पुर येत आहे.
त्यामुळे या भागातील लहान पुल पाण्याखाली जात आहेत. या परिसरातील पुल पाण्याखाली गेल्याने या भागातील महादेवाडी, तवलीबेंद, माळीमळा, पऱ्हाडवाडी या वस्त्यांना प्रवासासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी गेली 2 ते 3 वर्षापासून वेळ नदीला इतक्या मोठ्या प्रमाणात पूर कधीच आलेला नव्हता.
मात्र बंधारा भरल्यामुळे मोठा पूर पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतीला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे या परिसरातील पुलांची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिरुर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड व उद्योजक प्रमोद पऱ्हाड यांनी सांगीतले.
शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…
मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…