शिरूर तालुका

केंदूर परिसरातील वेळनदीला पुर आल्याने पुल पाण्याखाली

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील वेळ नदीला अनेक वर्षानंतर पूर आलेला असल्याने येथील पूल पाण्याखाली गेला त्यामुळे परिसरातील वा वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांचा संपर्क तुटला असल्याने येथील पुलाची उंची वाढवण्याची मागणी परिसरातील नागरिक व ग्रामस्थ करत आहेत.

केंदूर (ता. शिरुर) येथील वेळ नदीला पुर आल्याने केंदूर- धामारी व पऱ्हाडवाडी- मुखई या नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने नागरिकांचा संपर्क तुटलेला आहे. वेळनदी वरील थिटेवाडी बंधारा 100 टक्के भरलेला असल्याने सातगाव पठार परिसरात तसेच नदी भागात मुसळधार पाउस झाल्यास नदीला मोठा पुर येत आहे.

त्यामुळे या भागातील लहान पुल पाण्याखाली जात आहेत. या परिसरातील पुल पाण्याखाली गेल्याने या भागातील महादेवाडी, तवलीबेंद, माळीमळा, पऱ्हाडवाडी या वस्त्यांना प्रवासासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी गेली 2 ते 3 वर्षापासून वेळ नदीला इतक्या मोठ्या प्रमाणात पूर कधीच आलेला नव्हता.

मात्र बंधारा भरल्यामुळे मोठा पूर पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतीला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे या परिसरातील पुलांची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिरुर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड व उद्योजक प्रमोद पऱ्हाड यांनी सांगीतले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

6 मिनिटे ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

13 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

13 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

13 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

13 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

13 तास ago